Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर देवेंद्र फडणवीसांचे नियंत्रण…”; खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा

केंद्र सरकारकडून देशाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. मात्र यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्प व राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 02, 2025 | 12:48 PM
Mp sanjay raut live press conference target modi government on pahalgam terror attack

Mp sanjay raut live press conference target modi government on pahalgam terror attack

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीमधील काही नेते हे मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे नाराज आहेत तर महाविकास आघाडीमधील नेते दारुण पराभव झाल्यामुळे नाराज आहेत. महायुतीला एकतर्फी यश मिळून देखील त्यांच्यामध्ये अनेक गोष्टींवरुन वादंग निर्माण झाला आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत य़ांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण असल्याचे बोलले जात आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

माध्यमांशी संवाद साधताना खासदार राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन देण्यात आलं होतं, असं एकनाथ शिंदे खासगीत सांगतात. हे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे, त्यांना विचारा, निवडणुकीनंतर त्यांना खड्यासारखं बाजूला केलं. काही मंत्रिपद आणि महत्वाची खाती दिली, पण एकनाथ शिंदेंचा चेहरा पाहिल्यावर तुम्हाला कळेल, ते अजून धक्क्यात आहेत. 50-55 जागा कशा मिळाल्या हा पहिला धक्का आणि दुसरा म्हणजे भाजपने शब्द पाळला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे कोलमडले आहेत. त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आपण पुन्हा मागं फिरायचं का?

खासदार राऊत यांनी शिंदे गटाबाबत अनेक दावे केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, ठत्यांची लोक समोर येऊन काहीपण सांगतील पण सरकारमध्ये मंत्रिपद असणं म्हणजे मानप्रतिष्ठा असते असं नाही. त्यांच्या (शिंदे गटाच्या) आमदारांमध्ये चलबिचल आहे. त्यांच्या पक्षाच्या एका गटावर फडणवीसांचे नियंत्रण आहे. किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीसांचे नियंत्रण आहे. ते आमदार देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांच्या सांगण्यावर सुरतला गेले होते, एकनाथ शिंदेंसाठी नाही. उरलेले लोक चलबिचल आहेत. आपल्याला नेतृत्व नाही, आपण पुन्हा मागं फिरायचं का? असा विचार सुरु आहे,ठ असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बिहारच्या तुलनेत महाराष्ट्राला काय मिळालं?

केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 12 लाखांपर्यंत उत्पन्न हे करमुक्त केल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र बजेटवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. खासदार राऊत म्हणाले की, कागदावरील बजेटवरुन लोकांना काय मिळणार हे बघण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. बिहारच्या तुलनेत महाराष्ट्राला काय मिळालं?, नरेंद्र मोदींचे प्रत्येक बजेट निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या असतात. भविष्यात बिहारच्या निवडणुका तिथे वर्षाव, जिथे भाजपचे सरकार नाही. त्या राज्यांच्या तोंडाला पान पुसतात, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बजेट समजलं नाही. आकडे आणि घोषणांवरुन जाऊन चालत नाही. ते जाणून घेण्यासाठी किमान 72 तास लागतात, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mp sanjay raut strongly criticizes union budget 2025 by modi government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • Mahayuti Governmet
  • sanjay raut
  • Union Budget 2025

संबंधित बातम्या

Sanjay Raut on Bihar Election: ‘१० हजारात लोकशाही विकली जाते…’; बिहारच्या निकालावर संजय राऊतांनी तोफ डागली
1

Sanjay Raut on Bihar Election: ‘१० हजारात लोकशाही विकली जाते…’; बिहारच्या निकालावर संजय राऊतांनी तोफ डागली

Sanjay Raut On Bihar Elections : “हा तर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! बिहार निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांची टीका
2

Sanjay Raut On Bihar Elections : “हा तर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! बिहार निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.