पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या अचानक भेटीला, काय आहे नेमकं कारण?
बीड : मागील दोन वर्षांपासून बीडचे राजकारण ढवळून निघाले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करण्यात आले असून मुंडेंवर आरोप देखील करण्यात आले. यावर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
पंकजा मुंडे यांनी त्यांना कार्यकर्त्यांचे अपार प्रेम व पाठिंबा मिळाल्या असल्याचे कबूल केले आहे. त्याचबरोबर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत झालेला संवाद सांगितला आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्यापेक्षा कुणी उंच झालं तरच तुमचं नेतृत्व करु शकेल. माझ्यापेक्षा मनाने उंच, शरीराने उंच, विचारांनी उंच, आचारांनी उंच असं नेतृत्व लाभो, अशा शुभेच्छा देखील पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. त्या म्हणाल्या की, “मला तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये गोपीनाथ मुंडे दिसतात. माझं कौतुक गोपीनाथ मुंडे करायचे, तुम्हीही करता. बाकी कुणी केलं नाही. मुंडे साहेब विचारायचे, पंकजा आली का? कशी चालली, कशी बोलली? माझ्यासारखी बोलते का? एक दिवस मला म्हणाले माझं काही काम नाही, ही माझी शेवटची निवडणूक. मी त्यांना विचारलं असं का म्हणता? तर म्हणाले समाज ज्या हातांमध्ये द्यायचा आहे ते हात तयार झाले. मी पुढची निवडणूक लढणार नाही असं गोपीनाथ मुंडे म्हणाले होते,” अशा आठवणी पंकजा मुंडे यांनी सांगितल्या आहेत.
पुढे पंकजा मुंडे यांनी राजकारणाबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील जोरदार चर्चा रंगली आहे. त्या म्हणाल्या की, “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे आहे. आपण किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात. कशातही आपलं नाव ओढतात, असं म्हणत पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातील टीका-टिप्पणीवर खंत व्यक्त केलीय. जालना येथे शिवसेनेच्यावतीने पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. तुमच्या नजरेत मला गोपीनाथ मुंडे दिसतात, ती नजर खाली जाऊ नये म्हणून राजकारणात आले आहे,” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याच्या राजकारणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, “आता मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः विषय अजून तसा धनंजय मुंडेंकडे केला नाही. स्वतः अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. यात संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू. संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, हा अजित दादांचा निर्णय आहे. तसेच तपास यंत्रणा त्यांना काळजी घेतील त्यावरच हे सगळं अवलंबून आहे. आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही. तुमची जी काही सेवा करायची आहे ती मी करणार. तुम्हाला आपल्या पोरांना, नातवांना सांगावंसं वाटतं की ही पंकजाताई, हे माझं समाधान आहे,” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.