Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar Birthday : राजकारण ते क्रिकेटमधील किंगमेकर! शरद पवारांचे हे नऊ निर्णय राहिले नेहमीच चर्चेत

Sharad Pawar Birthday : राज्यातील जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या राजकीय निर्णय आणि राजकीय प्रवास जाणून घेऊ.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 12, 2025 | 01:03 PM
MP Sharad pawar birthday special article on political journey of baramati leader

MP Sharad pawar birthday special article on political journey of baramati leader

Follow Us
Close
Follow Us:

Sharad Pawar Birthday : महाराष्ट्रातील जेष्ठ राजकीय नेते शरद पवारांचा आज वाढदिवस आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार शरद पवार हे त्यांचा 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राज्यासह केंद्रीय राजकारण फिरवण्याचे सामर्थ्य ठेवणारे शरद पवार यांनी 63 वर्षे राजकारण केले. राजकारातील प्रत्येक चाल आधीच ओळखून त्याप्रमाणे राजकारण करणाऱ्या शरद पवारांनी अनेकांना मात दिली आणि सत्तेमध्ये जागा मिळवली. पुलोद सरकार निर्मिती असो वा महाविकास आघाडीची निर्मिती शरद पवार हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा मोठा आणि दीर्घकाळ परिणाम राहिला आहे. असे शरद पवार यांचे महत्त्वाचे आठ निर्णय पाहणार आहोतय

रेड्डी कॉंग्रेसमध्ये झाले सामील

शरद पवार यांनी सहा दशकाहून अधिक काळ राजकारणामध्ये काम केले असून याची सुरुवात त्यांनी 1 मे 1960 रोजी केली. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर, काँग्रेस दोन गटात विभागली गेली. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस. यशवंतरावांसोबत, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेते रेड्डी काँग्रेसमध्ये सामील झाले. रेड्डी कॉंग्रेसमध्येही शरद पवार हे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले.

सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री

जेष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. राज्यामध्ये रेड्डी कॉंग्रेस आणि इंदिरा गांधी यांच्या कॉंग्रेसच्या युतीचे सरकार होते. यामधून 40 आमदारांच्या पाठिंब्याने शरद पवारांनी राज्यात पुलोद सरकार स्थापन केले. शरद पवारांनी उठाव करुन निर्माण केलेले हे सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला. अनेक वर्षे पुलोद सरकारची जोरदार चर्चा होती. शरद पवारांच्या या राजकीय चालीचा त्यांच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला. त्यांचा या राजकीय चालीला ‘वसंतदाच्या पाठीत खंजीर खुपसला गेला’ असेही म्हटले जात होते.

हे देखील वाचा : राष्ट्रवादी राजकारणाचा शिल्पकार! अशी आहे त्यांच्या नेतृत्वाची यशस्वी कहाणी

पवारांची कॉंग्रेसमध्ये घरवापसी अन् पुन्हा मुख्यमंत्री

इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर आणि राजीव गांधी यांच्या बोलवल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षामध्ये घरवापसी केली. राजीव गांधी ही कॉंग्रेसमधील नवीन युवा पिढी म्हणून ओळखली जात होती. यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षाला साथ दिली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

जेव्हा पवार पंतप्रधान होण्याच्या जवळ होते

शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या याच काळात पवारांनी पंतप्रधान होण्याची संधी गमावल्याचे म्हटले जाते. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला, राष्ट्रीय पातळीवर पवारांचे पक्षातील स्थान महत्त्वाचे बनले होते, कारण ते काँग्रेसमध्ये परतले आणि मुख्यमंत्री झाले. १९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या झाली आणि काँग्रेसमधील नेतृत्वाचा प्रश्न एक प्रमुख मुद्दा बनला. सोनिया गांधी अद्याप राजकारणात आल्या नव्हत्या.काँग्रेसमधील अनेकांना, विशेषतः तरुणांना, पवारांनी पक्षाचे नेतृत्व करावे असे वाटत होते. पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले, पण मतदानात पी.व्ही. नरसिंह राव यांना जास्त मते मिळाली आणि पवारांची संधी हुकली.

पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात वापसी

६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी अयोध्येत बाबरी मशीद पाडली, ज्यामुळे देशात जातीय तणाव निर्माण झाला. याचा मोठा प्रभाव देशाची अर्थिक राजधानी मुंबईमध्ये तो जास्त जाणवला. मुंबईत दंगली झाल्या आणि देशाची आर्थिक राजधानी आगीत जळून खाक झाली. त्या कठीण काळात, मार्च १९९३ मध्ये, पवार तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मुंबई दंगलींच्या पार्श्वभूमीवर हा बदल झाला असला तरी, अनेकांनी त्याचा राजकीय अर्थ लावला आहे. नरसिंह राव यांना दिल्लीत पवारांच्या नावाचा प्रतिस्पर्धी नको होता, म्हणून त्यांनी त्यांना मुंबईत परत पाठवले.

दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या जवळ

१९९५ मध्ये महाराष्ट्रात सत्ता गमावलेले शरद पवार १९९६ मध्ये युती राजकारणाचा काळ सुरू झाल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात एक प्रमुख व्यक्ती बनले. नंतर, ते काँग्रेसच्या वतीने लोकसभेत विरोधी पक्षनेते झाले. युती राजकारणाच्या या काळात पवार दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीच्या जवळ आले. मात्र सोनिया गांधींशी त्यांचे संबंध ताणले गेले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा एक गट पवारांविरुद्ध काम करत राहिला. सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवारांचे स्वप्न पुन्हा बिनसले.

हे देखील वाचा : राजकारणातील चाणक्य अन् बहुआयामी व्यक्तीमत्त्व शरद पवारांचा वाढदिवस; जाणून घ्या 12 डिसेंबरचा इतिहास

राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना

शरद पवार यांची पंतप्रधान पदाची संधी गेल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप केला. 1999 मध्ये शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांचा नवा पक्ष निर्माण केला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापन करत नवीन राजकीय खेळी खेळली. त्यांच्या पक्षाशी विविध पक्षांची युती करत शरद पवार हे नेहमी सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न करु लागले. शरद पवार यांचा हा राजकीय स्ट्रोक एक मास्टर स्ट्रोक ठरला. केंद्रामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा भाग राहिला आणि पवार नवीन सरकारमध्ये सामील झाले. पुढील १० वर्षे ते कृषी मंत्री राहिले आहेत.

महाविकास आघाडीची स्थापना

2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सरकार स्थापना बिनसले. देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारुन उद्धव ठाकरे यांना साथ देत शरद पवार यांनी राज्यामध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अडीच वर्षे राज्यात सत्ता चालवली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार राज्याच्या राजकारणातील नवा प्रयोग ठरला.

राष्ट्रवादी पक्ष हातातून निसटला

शरद पवार यांच्या राजकारणामध्ये आणखी एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे त्यांनीच स्थापन केलेला पक्ष त्यांच्या हातातून गेला. शरद पवार यांचा पुतण्या अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केले. राष्ट्रवादीतील अनेक आमदारांसह त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. मात्र शाहू, फुले आणि आंबेडकरांची विचारधारा माननाऱ्या शरद पवारांनी याला विरोध केला. अजित पवारांनी दावा केल्यानंतर आणि निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार यांच्या हातातून त्यांचा पक्षाचे नाव, चिन्ह गेले. यानंतर देखील शरद पवार हे आजही राजकारणामध्ये सक्रीय असून त्यांचे निर्णय, मत आणि राजकीय हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाते.

Web Title: Mp sharad pawar birthday special article on political journey of baramati leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • Congress
  • NCP Politics
  • Sharad Pawar Birthday

संबंधित बातम्या

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
1

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया

२०२९ ची निवडणूक ‘मोदी विरुद्ध प्रियंका’? राहुल गांधी कमकुवत; भाजपने संसदेत खेळला मोठा राजकीय डाव!
2

२०२९ ची निवडणूक ‘मोदी विरुद्ध प्रियंका’? राहुल गांधी कमकुवत; भाजपने संसदेत खेळला मोठा राजकीय डाव!

Amit Shah on Congress: ‘नेहरूंनी PM बनणं ही पहिली ‘वोट चोरी…’ राहुल यांच्या आरोपांना अमित शाह यांचा थेट पलटवार
3

Amit Shah on Congress: ‘नेहरूंनी PM बनणं ही पहिली ‘वोट चोरी…’ राहुल यांच्या आरोपांना अमित शाह यांचा थेट पलटवार

MBMC च्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप? कठोर कारवाईची काँग्रेसकडून मागणी
4

MBMC च्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप? कठोर कारवाईची काँग्रेसकडून मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.