एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री होईन
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (दि.25) पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नव्या 20 दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी महायुतीमधील कामकाजाचे स्वरुप सांगितले. तसेच महायुती सरकार हे 24 तास काम करत असल्याचे देखील अजित पवार म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील लोकार्पण कार्यक्रमामध्ये उपस्थितांशी संवाद साधताना त्यांचा दिनक्रम सांगितला. तसेच महायुतीमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ते तीन शिफ्टमध्ये काम करतात असे देखील अजित पवार म्हणाले आहेत. ते म्हणाले की, आमचे सरकार 24 तास जनतेच्या सेवेत असते, असे म्हटले. “मी पहाटे 4 वाजता उठतो. फिरतो, व्यायाम करतो. पहाटे 4 वाजता उठून कामाला सुरुवात करतो. यानतंर 10 ते 11 पर्यंत काम करतो. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 11 ते 2 काम करतात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 2 ते 4 या वेळेत काम करतात. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार सदैव तत्पर आहे, असा कामाचा क्रम अजित पवार यांनी सांगितला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी महायुती सरकारने प्रयत्न केले. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः काश्मीर दौऱ्यावर गेले होते. या घटनेवर अजित पवार म्हणाले की, जी घटना घडली यामध्ये संपूर्ण भारत अक्षरशः बदला घेतला पाहिजे, त्यांची जागा दाखवली पाहिजे, निष्पक लोक जातात, भ्याड हल्ले होतात. पंतप्रधानांनी काही निर्णय घेतले आहेत, अशा गोष्टी होता कामा नये. त्याच्या डोक्यामधून हे सगळं आलं त्याला आपली भारतीय सेना सोडणार नाही याचा मला विश्वास आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
पहलगाम दहशतवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवार यांनी सरकारी कार्यालयाबाबत मत मांडले आहे. ते म्हणाले की, “राज्य सरकारची कोणतीही कार्यालये भाडेतत्त्वावर ठेवायची नाहीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेला उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी महायुती सरकार काम करत आहे. येत्या दोन-तीन वर्षात सर्व इमारतींचे काम पूर्ण झाले पाहिजे. मला सरकारी कार्यालये चांगली करण्याची आवड आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा मिळायला हव्यात. पार्किंगची समस्या मोठी आहे. त्यामुळे आता बांधल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था केली जाईल,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.