Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar : शेजारी देशांच्या धोरणाबाबत केंद्र सरकार अपयशी…; शरद पवारांनी व्यक्त केली खंत

शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये दौरा करत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणावर नाराजी व्यक्त केली.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 18, 2025 | 06:35 PM
ncp sharad pawar kolhapur press confernce upset on India's foreign policy

ncp sharad pawar kolhapur press confernce upset on India's foreign policy

Follow Us
Close
Follow Us:
  • शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
  • यावेळी त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर नाराजी व्यक्त केली
  • इथेनॉल धोरणात नितीन गडकरी यांचे योगदानाचे कौतुक केले

Sharad Pawar Press Confernce : कोल्हापूर : देशांबाबतच्या भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. “नेपाळसारख्या शांतता प्रिय देशात आज अराजकता निर्माण झाली आहे. भारतीयांना नेपाळमध्ये प्रवेश करताना पूर्वी कोणतेही बंधन नव्हते, मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तान कायमच भारताबद्दल कुरघोडी करतो, चीनसोबतचे संबंध चिंताजनक झाले आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारताने त्याग केला हे आज बांगलादेश विसरल्यासारखे दिसते, तर श्रीलंका देखील आपला मित्र राहिलेली नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकार परराष्ट्र धोरणात कितपत यशस्वी ठरत आहे, याचा विचार व्हायला हवा,” असे शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा आरक्षणावरील जाहिरातींवर टीका करताना पवार म्हणाले, “सरकारी जाहिराती दिसल्या नाहीत, या खासगी जाहिरातींवर पैसा कुठून आला? देवाभाऊंनी छत्रपतींचा आशीर्वाद मागितला, तो त्यांचा अधिकार आहे. पण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान लक्षात घेतलं का? छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यात सोन्याचा नांगर चालवला, आज मात्र शेतकऱ्यांना संकट भेडसावतंय. याचा विचार मुख्यमंत्री यांनी करायला हवा,” असा सल्ला जेष्ठ नेते शरद पवारांनी दिला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

राहुल गांधींच्या आरोपांवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाकडून काही निर्णयांवर विरोधी पक्षाची नाराजी आहे. एकदा माझ्याबरोबर तीनशे खासदार रस्त्यावर उतरले होते. आयोगाने दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. इतक्या मोठ्या संख्येने खासदार विरोधात गेले, म्हणजे प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसत नाही. आयोगाने विश्वासार्हता वाढवली पाहिजे,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

राज्यातील साखर उद्योगासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, “सध्या एकशेएक खासगी व नव्याण्णव सहकारी साखर कारखाने आहेत. त्यापैकी एकशेपस्तीस कारखान्यांनी कामगारांचे सहाशे कोटी रुपये थकवले आहेत. राज्यातील चाळीस टक्के साखर कामगार कंत्राटी आहेत. ‘साखर एके साखर’ हे चित्र परवडणारं नाही. बाय-प्रोडक्टचा विचार केला तरच हा उद्योग टिकेल. इथेनॉल धोरणात नितीन गडकरी यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्याला विरोध असेल असं मला वाटत नाही,” असेही पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मराठा आरक्षण चळवळीबाबत पवार म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटच्या आधारे दिशा दाखवली. प्रश्न सुटावा असं सर्वांना वाटतं. पण समाजातील कटुता कमी होणं गरजेचं आहे. गावागावात संघर्ष आणि वैमनस्य वाढणं महाराष्ट्राला परवडणारे नाही. संवाद साधून वातावरण निर्मळ केलं पाहिजे,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस देशभर उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने “पंच्याहत्तराव्या वर्षी पंतप्रधानांनी थांबायला हवे का?” या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, “पंच्याहत्तराव्या वर्षी मी स्वतः थांबलो नाही, त्यामुळे मला बोलायचा नैतिक अधिकार नाही. भाजपामध्ये काही नेते पंच्याहत्तर वर्षांनंतर थांबले, मात्र आता तेच नेते ‘असं कधी बोललो नाही’ असं सांगतात,” अशी टीका त्यांनी केली.

Web Title: Ncp sharad pawar kolhapur press confernce upset on indias foreign policy political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 06:35 PM

Topics:  

  • Election Commission
  • political news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Bansuri Swaraj Viral Video : बांसुरी स्वराज यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान? व्हिडिओ व्हायरल होताच दिलं स्पष्टीकरण
1

Bansuri Swaraj Viral Video : बांसुरी स्वराज यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान? व्हिडिओ व्हायरल होताच दिलं स्पष्टीकरण

Gold Ring to Girl Child : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी; कोणत्या जिल्ह्यात मिळणार सुविधा?
2

Gold Ring to Girl Child : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी; कोणत्या जिल्ह्यात मिळणार सुविधा?

Thane News : महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,फडणविसांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
3

Thane News : महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,फडणविसांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

नागपुरात निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये वाद; माजी मंत्री सुनील केदारांना आव्हान, प्रदेशाध्यक्षांचे सुरु झाले एकजुटीचे प्रयत्न
4

नागपुरात निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये वाद; माजी मंत्री सुनील केदारांना आव्हान, प्रदेशाध्यक्षांचे सुरु झाले एकजुटीचे प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.