Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Elections : ‘बिहार निवडणुकीत एनडीए 160 पेक्षा जास्त जागा जिंकेल’; अमित शहांनी व्यक्त केला विश्वास

14 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील, तेव्हा एनडीए १६० हून अधिक जागा जिंकेल. या निवडणुकीत युतीतील सर्व पक्षांचा स्ट्राईक रेट चांगला असेल, असेही म्हटले आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 05, 2025 | 07:23 AM
'बिहार निवडणुकीत एनडीए 160 पेक्षा जास्त जागा जिंकेल'; अमित शहांनी व्यक्त केला विश्वास

'बिहार निवडणुकीत एनडीए 160 पेक्षा जास्त जागा जिंकेल'; अमित शहांनी व्यक्त केला विश्वास

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा दावा केला आहे. त्यांनी 14 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील, तेव्हा एनडीए 160 हून अधिक जागा जिंकेल. या निवडणुकीत युतीतील सर्व पक्षांचा स्ट्राईक रेट चांगला असेल, असेही म्हटले आहे.

बिहार निवडणुकीच्या पोस्टर्समधून लालू यादव यांचा फोटो वगळल्याबद्दल अमित शाह यांनी महाआघाडीवर निशाणा साधला. त्यांनी महाआघाडीला लालू यादव यांचा फोटो का वगळला असे म्हणत टीका केली. ते म्हणाले, ‘आम्ही आमच्या नेत्यांचा सन्मान करतो. आमच्या पोस्टर्सवर असे बरेच लोक आहेत जे निवडणूक लढवत नाहीत, तरीही आम्ही त्यांना समाविष्ट करतो. पण, महाआघाडी असं करताना दिसत नाही. त्यांनी त्यांच्या आघाडीतील नेत्याचा फोटोच लावला नाही’.

दरम्यान, बिहार निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांना उभे न करण्याच्या प्रश्नाबाबत अमित शाह म्हणाले की, एनडीएकडून चार मुस्लिम उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यातच आमच्याकडून प्रभावी उमेदवारांनाच तिकीट दिले जाते, असे म्हणत विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

काँग्रेसवरही साधला निशाणा

यादरम्यान, अमित शहांना राहुल गांधी यांच्या विधानाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, या विधानांचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील. जेव्हा-जेव्हा पंतप्रधान मोदींविरुद्ध अपशब्द वापरले गेले आहेत मणिशंकर अय्यर ते सोनिया गांधी यांच्यापर्यंत तेव्हा भाजपने अधिक जोरदार विजय मिळवला आहे. यावेळी काँग्रेस नेत्याने अनेकांचा अपमान केला आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

मोकामा घटनेमुळे नुकसान होणार?

मोकामा घटनेमुळे नितीश सरकारच्या जंगलराजवर हल्ला करण्याच्या प्रतिमेला धक्का बसेल का? यावर अमित शहा म्हणाले की, कोणत्याही कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीत एकही घटना घडणार नाही, असे म्हणता येणार नाही. जेव्हा एखाद्या घटनेनंतर कायदा माणसाच्या शक्तीनुसार चालतो तेव्हा जंगलराज पसरतो.

हेदेखील वाचा : Bihar Election Survey 2025: बिहार निवडणुकीचे काय असतील निकाल? तीन दिग्गजांची भविष्यवाणी

Web Title: Nda will win more than 160 seats in bihar elections amit shah expresses confidence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 07:10 AM

Topics:  

  • Amit Shah
  • Bihar Elections
  • Bihar Politics
  • political news

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा; बिहारच्या निवडणुकीमध्ये जोरदार सुरु राजकारण
1

देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा; बिहारच्या निवडणुकीमध्ये जोरदार सुरु राजकारण

Local Body Elections 2025: निवडणुकीचे बिगुल वाजले! सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा,१ नगरपंचायतीत उमेदवार आजमविणार नशीब
2

Local Body Elections 2025: निवडणुकीचे बिगुल वाजले! सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा,१ नगरपंचायतीत उमेदवार आजमविणार नशीब

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द! नियमितीकरणासाठी कोणतेही शुल्क नसल्याची मंत्री बावनकुळेंची घोषणा
3

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द! नियमितीकरणासाठी कोणतेही शुल्क नसल्याची मंत्री बावनकुळेंची घोषणा

सत्य मोर्च्यामध्ये किती आहे तत्थ? महाराष्ट्राच्या राजकारणात उडाला मतदार याद्यांचा गोंधळ
4

सत्य मोर्च्यामध्ये किती आहे तत्थ? महाराष्ट्राच्या राजकारणात उडाला मतदार याद्यांचा गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.