नीतीश कुमार हे मुख्यमंत्री पद सोडून राज्यसभेच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. यामुळे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
बिहारमधील मुझफ्फरपूरचा कनिष्क नारायण तब्बल २० वर्षांनंतर मायदेशी परतला. ब्रिटनमध्ये एआय आणि ऑनलाईन सुरक्षा मंत्री म्हणून काम करणाऱ्या या ‘बिहारी बाबू’चे पटना आणि मुझफ्फरपूरमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.
बिहारमध्ये AIMIM पक्षात संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काही आमदार जेडीयूमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर AIMIMकडून ठाम नकार देण्यात आला आहे. आमदारांनी पक्षात कोणतीही फूट नसल्याचं स्पष्ट केलं.
नितीश कुमार यांनी महिला डॉक्टरांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागण्यात आले. यावर माफी मागणार का असा सवाल करण्यात आल्यावर त्यांनी पळ काढला.
१८ व्या बिहार विधानसभेच्या शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सभागृहामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. आमदार विभा देवी यांना शपथपत्र वाचता देखील आले नाही.
काँग्रेस पक्षाच्या मूलभूत तत्त्वांबाबत, शिस्त आणि संघटनात्मक शिष्टाचाराबाबत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल आणि पक्षाच्या व्यासपीठाबाहेर वारंवार अवांछित आणि दिशाभूल करणारी विधाने केल्याबद्दल कारवाई केल गेली.
१७ वी विधानसभा विसर्जित झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. आता ते दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
विरोधी महागठबंधनचा दारूण पराभव झाला. त्यात नामुष्की ओढवणाऱ्या पराभवानंतर लालू प्रसाद यांच्या कुटुंबात मोठी फूट पडली आहे. लालू प्रसाद यांना किडनी देणारी त्यांची मुलगी रोहिणी यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.
पहिल्या टप्प्यात एनडीएची विश्वासार्हता पणाला लागली असली तरी, भाजपाची खरी परीक्षा दुसऱ्या टप्प्यात आहे. शिवाय, केवळ राजदच नाही तर काँग्रेसलाही स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान असेल.
PM Modi on Bihar Elections: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन बिहारी जनतेला खास आवाहन केले आहे. आधी मतदान नंतर नाष्टा करा असे देखील पंतप्रधान मोदी बिहारी जनतेला…
14 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील, तेव्हा एनडीए १६० हून अधिक जागा जिंकेल. या निवडणुकीत युतीतील सर्व पक्षांचा स्ट्राईक रेट चांगला असेल, असेही म्हटले आहे.
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत पीके यांना बिहारच्या राजकारणाच्या त्रिकोणाचा तिसरा कोन मानले जाऊ शकते का? जनतेमध्ये त्यांचा किती प्रभाव आहे? हा मूळ प्रश्न आहे.
आमच्या सरकारनंतर हे लोक एकही भरती मोहीम राबवू शकले नाहीत. आमचे स्वप्न आहे की बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात कारखाने सुरू व्हावेत, चांगली रुग्णालये आणि शाळा उभ्या राहाव्यात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता कर्पूरी ग्रामला भेट देतील आणि भारतरत्न दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना पुष्पांजली अर्पण करतील. त्यानंतर, ते त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करतील.
लालू यादव केंद्रात असो वा राज्यात, त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. बिहारचे लोक २१ व्या शतकात लालू यादव यांचे 'जंगल राज' कधीही परत आणणार नाहीत.