Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Violence News : नागपूर हिंसाचार प्रकरणावर नितीन गडकरींची प्रतिक्रिया; म्हणाले,”ज्यांनी गैरकृत्य केली त्यांना सरकार…”

Nagpur Violence News : नागपूरमध्ये औरंगजेब कबर मुद्द्यावरुन दंगल पेटली. यामध्ये जमावाने पोलिसांवर देखील हल्लाबोल केला. यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 18, 2025 | 12:05 PM
Nitin Gadkari reaction on Nagpur violence over Aurangzeb tomb controversy

Nitin Gadkari reaction on Nagpur violence over Aurangzeb tomb controversy

Follow Us
Close
Follow Us:

Nagpur Violence News : नागपूर : औरंगजेबाच्या कबरच्या वादावरुन नागपूरमध्ये दंगल झाली आहे. काल रात्री (दि.17) नागपूरमध्ये मोठ्या जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केली. वाहनांची तोडफोड तसेच पोलीस दलावर देखील दगडफेक केली. जेसीबी जाळण्यात आला. यामुळे नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले असून नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागांतील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. या दंगलीवर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये मोठ्या जमावाने दंगल केली. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी सध्या तरी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असले तरी देखील तणावपूर्ण परिस्थिती आहे. या घटनेमुळे औरंगजेब कबर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरामध्ये साजरी केली जात असताना हा प्रकार घडल्यामुळे यावर जोरदार रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शांतता राखण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय म्हणाले नितीन गडकरी?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर दंगलीवर प्रतिक्रिया दिली. यावर ते म्हणाले की, “नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली. अशा सर्व परिस्थितीमध्ये नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास ही नागपूरची विशेषता राहिली आहे. माझी सर्व बांधवांना विनंती आहे की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

पोलिसांना सहकार्य करावं

पुढे ते म्हणाले की, “नागपूरमध्ये शांतता प्रस्तापित करावी. आणि कोणीही रस्त्यांवर उतरु नये. सगळ्यांनी कायदा व व्यवस्थेला सहकार्य करावं. सलोख्याचे आणि सदोर्हाचे वातावरण कायम ठेवावे. शांतता ठेवण्याची नागपूरची ही जी परंपरा आहे ती कायम ठेवावी. ज्या लोकांनी चूका केल्या असतील किंवा ज्या लोकांनी गैर कायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे. असा विश्वास देखील सर्वांना देतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या संदर्भातील सर्व माहिती मिळालेली आहे. पण आपण कोणत्याही अफवांवर लक्ष न ठेवता सहकार्य करावं. प्रेमाचं आणि उत्तम वातावरण ठेवण्यासाठी मदत करावी. पोलिसांना सहकार्य करावं,” अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नागपूर हिंसाचार प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “नागपूरच्या महाल भागामध्ये जी घटना घडली आहे ती अतिशय अयोग्य आहे. अशा प्रकारे जमाव जमा होऊन दगडफेक होणं हे अत्यंत चुकीचं आहे. माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे. नागपूर शहर हे एकोप्याने राहणारे शहर आहे. त्यामुळे कोणीही शांतता भंग करु नये. मी स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले आहे की, जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतले जाईल. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी याठिकाणी शांतता ठेवावी,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केले आहे.

Web Title: Nitin gadkari reaction on nagpur violence over aurangzeb tomb controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur Police
  • Nagpur Violence
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर
1

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट
2

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना
3

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा
4

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.