Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘…ते देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त

उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याआधी, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून एक मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 01, 2025 | 08:34 PM
दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल (Photo Credit- X)

दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
  • IND vs PAK सामना पाहणारे देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त
  • शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी
मुंबई: आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून नवव्यांदा ट्रॉफी आपल्या नावावर केली. भारताच्या या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू असतानाच आता त्याचे राजकीय पडसादही उमटताना दिसत आहेत. उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याआधी, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून एक मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे. “ज्या लोकांनी हा सामना पाहिला, ते देशद्रोही आहेत,” असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर एक मोठी चर्चा सुरू केली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या परिस्थितीत आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर देशात अनेक ठिकाणी विरोध सुरू झाला होता. त्यावेळी विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता आणि सामना रद्द करण्याची मागणी केली होती. शिवसेनेने या विरोधात सातत्याने आवाज उठवला होता. मात्र, केंद्र सरकारने नियमांचे कारण देत सामन्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी एक देशभक्त म्हणून तो सामना पाहिला नाही. जे लोक हा सामना पाहत होते, ते देशद्रोही आहेत. देशभक्ती फक्त खेळ पाहण्यापुरती मर्यादित असू शकत नाही. देशहिताच्या बाबींमध्ये जागरूक राहणे आणि योग्य वेळी सक्रिय असणे हीच खरी देशभक्ती आहे.”

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद | मातोश्री, मुंबई – #LIVE https://t.co/6Y32DHniUs — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 1, 2025

Shivsena Dasra Melava budget : “63 कोटी लागणार आहेत म्हणे….! ठाकरेंच्या दसऱ्याचा मेळाव्याचा भाजपने थेट मांडला हिशोब

राज्य सरकारवर गंभीर आरोप

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील पूर आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचाही उल्लेख केला आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “महाराष्ट्र सध्या भीषण पुराचा सामना करत आहे. मी राज्य सरकारला हात जोडून विनंती केली होती की, कोणत्याही राजकारणाशिवाय शेतकऱ्यांच्या मदतीला धावून या. मात्र, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे कोणतीही योजना दिसत नाही. ते सर्वजण फक्त आपल्या जाहिरात आणि ब्रँडिंगमध्ये व्यस्त आहेत. अजित पवार कोणत्याही गोष्टीचा भाग दिसत नाहीत आणि एकटे पडले आहेत.”

काही साखर कारखानदारांनी त्यांच्या कर्जात बुडालेल्या गिरण्या वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची विमा रक्कम घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. “जर भाजप या राजकीय नेत्यांना सुरक्षा देण्यास तयार असेल, तर आमच्या शेतकऱ्यांना का नाही? राज्य सरकार ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क का वसूल करत आहे? साखर संघांनीही आता याचा विरोध केला आहे,” असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी केली. ते म्हणाले, “जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते, तेव्हा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी मला पत्र लिहून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत आणि विशेष पॅकेजची मागणी केली होती. मी तेव्हा कृषी कर्जमाफी जाहीर केली होती, आता मुख्यमंत्रीही असेच करतील का?”

उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पथकाने अद्यापही पूरग्रस्त भागाचा दौरा न केल्याबद्दलही टीका केली. “आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी करतो. राज्य सरकारने ‘दुष्काळ’ आणि ‘नैसर्गिक आपत्ती’ यांसारख्या शब्दांचा खेळ थांबवून नुकसान झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

Shivsena Dussehra Melava : तेव्हा तुम्ही कुठल्या गोधडीत मुतत होता? शिंदे गटावर टीका करताना संजय राऊतांचा गेला तोल

Web Title: Uddhav thackeray attacks the government before the dussehra gathering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Eknath Shinde
  • IND VS PAK
  • Maharashtra Politics news
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले
1

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: निकालापूर्वीच आरोप! म्हणे, “भारत जादूटोणा करून मॅच जिंकतो…”, पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाचा अजब दावा
2

IND vs PAK: निकालापूर्वीच आरोप! म्हणे, “भारत जादूटोणा करून मॅच जिंकतो…”, पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाचा अजब दावा

IND vs PAK : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष! इशान किशनची निर्णायक खेळी, वाचा सामन्याचा अहवाल
3

IND vs PAK : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष! इशान किशनची निर्णायक खेळी, वाचा सामन्याचा अहवाल

“जवानांच्या रक्तावर क्रिकेटचा खेळ नको…,” IND vs PAK सामन्यावरून शिवसेना ‘उबाठा’ नेते आक्रमक; कोलंबोत मात्र चाहत्यांचा फिव्हर
4

“जवानांच्या रक्तावर क्रिकेटचा खेळ नको…,” IND vs PAK सामन्यावरून शिवसेना ‘उबाठा’ नेते आक्रमक; कोलंबोत मात्र चाहत्यांचा फिव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.