
IND vs PAK सामन्यावरून शिवसेना 'उबाठा' नेते आक्रमक (Photo Credit- X)
उबाठा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या सामन्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्या म्हणाल्या की, “हा सामना काही अत्यावश्यक किंवा मोठी क्रीडा स्पर्धा नाही. हा सामना पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि लाल किल्ल्यावरील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय जवानांच्या आणि नागरिकांच्या रक्तावर आयोजित केला जात आहे.”
#WATCH | कोलकाता: शिवसेना(UBT) सांसद प्रियंका चतुर्वेदी ने ICC T20 वर्ल्ड कप 2026 में आज होने वाले भारत-पाकिस्तान मैच पर कहा, “मुझे नहीं लगता कि इस मैच की ज़रूरत है, मुझे नहीं लगता कि यह कोई बड़ा स्पोर्टिंग कार्यक्रम है। मुझे लगता है कि यह पहलगाम आंतकी हमले में मारे गए भारतीयों… pic.twitter.com/iZ9I1B0VaW — ANI_HindiNews (@AHindinews) February 15, 2026
प्रियांका चतुर्वेदी यांनी पुढे असाही आरोप केला की, “आयसीसीने (ICC) पाकिस्तानला खेळण्यास राजी केले आणि बीसीसीआय (BCCI) व पीसीबी (PCB) ला केवळ मोठ्या आर्थिक फायद्यासाठी हा सामना खेळणे महत्त्वाचे वाटते. देशासाठी ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.”
सामन्यातील जाहिरातींचे दर भिडले गगनाला, एका ओव्हरमध्ये किती कमाई, 1 बॉलची किंमत किती?
उबाठा नेते आनंद दुबे यांनीही या सामन्याच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधानांच्या एका जुन्या विधानाची आठवण करून देत त्यांनी विचारले की, “जर ‘रक्त आणि पाणी’ एकत्र वाहू शकत नाही, तर मग पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने का खेळले जात आहेत? पाकिस्तानचा संघ अत्यंत कमकुवत आहे. सुरुवातीला त्यांनी बांगलादेशशी मैत्री दाखवण्यासाठी सामना न खेळण्याची धमकी दिली होती, पण केवळ पैशासाठी त्यांनी शेवटी संमती दर्शवली. हा आता खेळ राहिलेला नाही, तर तो निव्वळ व्यवसाय झाला आहे.”
#WATCH | Mumbai, Maharashtra: On the India-Pakistan match scheduled for today in the ICC T20 World Cup 2026, Shiv Sena (UBT) leader Anand Dubey says, “… We have great respect for the sport, but on one side, the PM says that blood and water cannot flow together. On the other… pic.twitter.com/rb54u2nL9q — ANI (@ANI) February 15, 2026
राजकीय स्तरावर सुरू असलेल्या या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, कोलंबोमध्ये मात्र क्रिकेटप्रेमींचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. जगभरातून आलेले चाहते ‘आर. प्रेमदासा स्टेडियम’बाहेर गर्दी करत आहेत. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने कोणत्याही राजकीय वादावर भाष्य करणे टाळले असून, “मैदानावरील कामगिरीसाठी फक्त २४ तास वाट पाहा,” असे म्हणत आपल्या खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय समर्थकांना संघाच्या विजयाची खात्री आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांचा संघ भारताचा ‘अतिआत्मविश्वास’ मोडून काढेल असा दावा केला आहे.
सांख्यिकीयदृष्ट्या भारताचा वरचष्मा आहे. विश्वचषकाचा इतिहास आणि सध्याचा फॉर्म पाहता, भारतीय संघाला जोरदार फायदा असल्याचे दिसून येते. भारताने पाकिस्तानविरुद्ध १६ पैकी १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत, तर त्यांचा विश्वचषक विक्रम ७-१ असा आहे. सध्या, दोन्ही संघ त्यांचे सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर ग्रुप अ मध्ये बरोबरीत आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारत +३.०५० च्या उत्कृष्ट नेट रन रेटसह आघाडीवर आहे.