
फोटो सौजन्य- pinterest
तांब्याची अंगठी घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेदाने तांब्याची अंगठी घालण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार तांब्याला ऊर्जेचे सर्वात पवित्र आणि शुद्ध रूप मानले जाते. ते परिधान केल्याने सूर्य आणि मंगळ शांत राहतात, कारण तांबे हा सूर्य आणि मंगळाचा धातू मानला जातो.
तांब्याच्या अंगठीमूळे अंगातील उष्णता कमी होते. हा फायदा तर सर्वच जणांना माहिती आहे पण तांब्याच्या अंगठीमुळे आपल्या शरीरास होणारे हे फायदे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात. जाणून घेऊया तांब्यापासून बनवलेल्या अंगठीला बोटामध्ये घातल्याने होणारे फायदे.
कॉपर म्हणझे तांबा याचा वापर खूप वर्षापासून केला जात आहे. पाण्यातील कीटकांना दूर करण्याची एक खास गुणवत्ता तांब्यामध्ये आहे, म्हणून तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणीपिण्याचाही सलाह दिले जाते.
तांब्याची अंगठी रक्त दाबाला नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करते. कमी रक्तदाबाने ग्रासलेल्या लोकांसाठी भरपूर फायदेशीर ठरते.
तांब्याची अंगठी पोटासंबंधी सर्व समस्यावर उपयुक्त ठरते. ही पोटदुखी, पचन न होणे आणि ॲसिडिटी सारख्या समस्येवर फायदेशीर ठरते.
तांब्याची अंगठी घातल्यावर रक्तातील अशुद्धता दूर होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते.
तांब्याची अंगठीमुळे शरीरातील उष्णता कमी होते. शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. तसेच तांब्याच्या अंगठीमुळे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होते
तांब्याच्या अंगठीमुळे रक्तदाब नियंत्रित होतो. त्याचबरोबर तांब्याची अंगठी घालून तुम्ही शरीरातील सूज देखील कमी करू शकता.
ज्योतिषशास्त्रानुसार, अनामिकेमध्ये तांब्याची अंगठी घालावी, कारण हे बोट सूर्याचे प्रतीक आहे. जर तुमच्या कुंडलीत सूर्याशी संबंधित दोष असतील, तर ही अंगठी त्यांचे परिणाम कमी करण्यास मदत करते. सूर्यासोबतच, ही अंगठी मंगळाच्या अशुभ प्रभावांपासूनही दिलासा देते.
रविवार आणि मंगळवार हे वार तांब्याची अंगठी घालण्यासाठी शुभ मानले जातात. तुमच्या कुंडलीतील बलवान सूर्याचे द्योतक आहे, जे प्रगती आणि यशाकडे घेऊन जाते. शिवाय, मंगळवारी अंगठी घातल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष दूर होतो आणि जीवनातील सर्व समस्या नाहीशा होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, उजव्या हाताच्या अनामिकेत अंगठी घालणे शुभ मानले जाते. अंगठी घालण्यापूर्वी ती शुद्ध करावी.
तांब्यापासून बनवलेल्या अंगठीचे हे सर्व फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही ही अंगठी शुद्ध ताब्यांपासून बनवलेली असेल. एक छोटीशी अंगठी तुम्हाला एवढे फायदे देऊ शकते तर तुम्ही ही अंगठी घालण्यास विलंब करूच नका.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ज्योतिषशास्त्रानुसार तांबे सूर्याशी संबंधित मानले जाते. तांब्याची अंगठी घातल्याने आत्मविश्वास, ऊर्जा आणि सकारात्मकता वाढते, असे मानले जाते.
Ans: साधारणतः अनामिका (रिंग फिंगर) किंवा मधल्या बोटात घालणे शुभ मानले जाते. काही लोक ती उजव्या हातात घालण्याचा सल्ला देतात.
Ans: सूर्य ग्रहाचा प्रभाव मजबूत होतो, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढतात, नकारात्मक ऊर्जा कमी होते