Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakyaniti : सर्वात कमी बोलणारी माणसं का करतात जगावर राज्य ? चाणक्यांनी दिलं मुद्देसूत उत्तर

खूप जण असे असतात जे फार कमी बोलतात. या कमी बोलणाऱ्या माणसांमध्ये जग जिंकण्याची ताकद असते असं चाणक्य सांगतात. चाणक्य असं का सांगतात ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 07, 2026 | 03:21 PM
Chanakyaniti : सर्वात कमी बोलणारी माणसं का करतात जगावर राज्य ? चाणक्यांनी दिलं मुद्देसूत उत्तर
Follow Us
Close
Follow Us:
  • सर्वात कमी बोलणारी माणसं का करतात जगावर राज्य ?
  • चाणक्यांनी दिलं मुद्देसूत उत्तर
Chanakya Niti: हिंदू धर्मात आचार्य चाणक्य यांना सर्वात कुशल आणि बुद्धीमान गुरु म्हटलं जातं. चाणक्य फक्त वैदिक शास्त्रात पारंगत नव्हते तर मानवी स्वभावाचा देखील त्यांना अभ्यास होता. चाणक्यंनी मानवी स्वभावाचे अनेक रहस्य सांगितली आहेत. गप्पा मारणं किंवा खूप बोलणं हे कोणाला नको असतं पण खूप जण असे असतात जे फार कमी बोलतात. या कमी बोलणाऱ्या माणसांमध्ये जग जिंकण्याची ताकद असते असं चाणक्य सांगतात. चाणक्य असं का सांगतात ते जाणून घेऊयात.

चाणक्य असं म्हणतात की, जी व्यक्ती कमी बोलते ती स्वत: शी जास्त जोडलेली असते. अशी माणसं फार संयमी असतात. सध्याचं जग हे फार वेगवान झालंय. त्यामुळे प्रत्येकाला व्यक्त होण्याची घाई असते. म्हणजे कोणी आरे केलं तर त्याला कारे करण्याची घाई असते. खरंतर आपल्याला कोणी विनाकारण बोललं तर ऐकून घ्यायचं नाही हे कितीही खरं असलं तरी काही वेळा शांत राहणं देखील तितकंच महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेला बोलून मोकळं होण्याची गरज नाही काही शांततेत घेणं देखील तितकंच गरेजचं असतं. कुठे शांत रहायचं आणि कुठे काय बोलायचं हे ज्याचं त्याला कळणं गरजेचं आहे. हे गणित ज्याला जमलं त्याला जग जिंकता येतं असं चाणक्य सांगतात.

समुद्र मंथनाच्या वेळी असं काही घडलं की भगवान विष्णूंनी केला शिरच्छेद ; राहू केतूची ‘ही’ पुराणकथा तुम्हाला माहितेय का ?

कमी बोलल्याने शब्दांचे मूल्य वाढते
चाणक्यांच्या मते, जो व्यक्ती सतत बोलत असतो, त्याच्याकडे लोक लक्ष देणे थांबवतात.पण एखादी व्यक्ती जरी खूप कमी बोलत असली, तरी जेव्हा ती तोंड उघडते, तेव्हा लोक खूप लक्षपूर्वक ऐकतात. चाणक्य म्हणतात की, कमी बोलल्याने माणसाच्या शब्दांचे मूल्य वाढते आणि समाजात त्याच्याकडे आदराने पाहिले जाते.

विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती वाढते. चाणक्य नीतीनुसार, जे कमी बोलतात ते आपल्या मनाचा अधिक वापर करतात.ते कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देण्याची घाई करत नाहीत. ते आधी परिस्थिती पूर्णपणे समजून घेतात आणि मग विचारपूर्वक निर्णय घेतात. यामुळेच त्यांचे निर्णय अनेकदा योग्य ठरतात आणि समाज त्यांना शहाणे मानतो.अशी माणसं आत्मविश्वासाने भरलेली असतात.

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य म्हणतात की, जे लोक कमी बोलतात ते ढोंगी नसतात. त्यांना स्वतःवर पूर्ण विश्वास असतो, त्यामुळे ते इतरांना प्रभावित करण्यासाठी वायफळ बडबड करत नाहीत. चाणक्य म्हणतात की, हाच शांत स्वभाव त्यांची खरी शक्ती बनतो.जेव्हा तुम्ही कमी बोलता, तेव्हा तुमचे गूढ टिकून राहते आणि लोक तुमच्याबद्दल प्रभावित राहतात. तुम्हाला इतरांना समजून घेण्याची संधी मिळते.

आचार्य चाणक्यांच्या मते, कमी बोलण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्हाला इतरांचे ऐकण्याची संधी मिळते.चाणक्याचा असा विश्वास होता की केवळ एक चांगला श्रोताच इतरांच्या कमकुवतपणा आणि गरजा समजू शकतो. जेव्हा तुम्ही इतरांचे शांतपणे ऐकता, तेव्हा तुम्हाला त्यांच्या विचारांची अंतर्दृष्टी मिळते, जी यशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

अरेरे! ‘या’ 2 राशींच्या व्यक्तींचा आज Break Up होणारच, वेळीच व्हा सावध; वाचवा आपले नाते

 

 

Web Title: Chanakyaniti why do the people who speak the least rule the world chanakya gave a concise answer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • hindu religion
  • Marathi News

संबंधित बातम्या

भारताला Global Trade Hub बनवण्याची मेगा तयारी! मोठ्या देशांसोबत होणार व्यापार करार, काय आहे महाप्लॅन?
1

भारताला Global Trade Hub बनवण्याची मेगा तयारी! मोठ्या देशांसोबत होणार व्यापार करार, काय आहे महाप्लॅन?

Share Market मध्ये Invest करताना रिस्कची भीती वाटतेय? LIC ने आणल्या 2 जबरदस्त स्कीम्स; पैशांवर मिळणार ‘गॅरंटीड रिटर्न’!
2

Share Market मध्ये Invest करताना रिस्कची भीती वाटतेय? LIC ने आणल्या 2 जबरदस्त स्कीम्स; पैशांवर मिळणार ‘गॅरंटीड रिटर्न’!

Ahilyanagar :  हक्काच्या शेतरस्त्यासाठी लढा, आंदोलनानंतर प्रशासनाचे कारवाईचे आश्वासन
3

Ahilyanagar : हक्काच्या शेतरस्त्यासाठी लढा, आंदोलनानंतर प्रशासनाचे कारवाईचे आश्वासन

Wardha News : वर्ध्यात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड; नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद
4

Wardha News : वर्ध्यात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड; नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.