वर्ध्यात काँग्रेसच्या वतीने संघटन सृजन अभियान राबवून जिल्हाध्यक्ष निवडीसाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. मात्र आता जिल्हाध्यक्ष निवड जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सुनील कोल्हे यांच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीनंतर काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य शैलेश अग्रवाल यांनी “हे संघटन सृजन नव्हे, तर संघटन विसर्जन अभियान आहे,” असा आरोप केला आहे. जिल्हाध्यक्षांची निवड ही संघटन सृजन अभियानाअंतर्गत झालेली नसल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याची भूमिकाही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडली. काँग्रेस नेते शेखर शेंडे,शैलेश अग्रवाल, आणि प्रवीण हिवरे यांनी एकत्र येत प्रतिक्रिया दिल्याने जिल्ह्यात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा समोर आली आहे.
वर्ध्यात काँग्रेसच्या वतीने संघटन सृजन अभियान राबवून जिल्हाध्यक्ष निवडीसाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. मात्र आता जिल्हाध्यक्ष निवड जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सुनील कोल्हे यांच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीनंतर काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य शैलेश अग्रवाल यांनी “हे संघटन सृजन नव्हे, तर संघटन विसर्जन अभियान आहे,” असा आरोप केला आहे. जिल्हाध्यक्षांची निवड ही संघटन सृजन अभियानाअंतर्गत झालेली नसल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याची भूमिकाही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडली. काँग्रेस नेते शेखर शेंडे,शैलेश अग्रवाल, आणि प्रवीण हिवरे यांनी एकत्र येत प्रतिक्रिया दिल्याने जिल्ह्यात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा समोर आली आहे.