Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘असं’ एक ठिकाण जिथे अंघोळ केल्याने येत नाही अकाली मृत्यू ; काय आहे याचं रहस्य ?

मृत्यू म्हटलं की प्रत्येकाला धडकी भरते.आपला असो की आपल्या जवळच्यांचा मृत्यू हा कायमच त्रास देणारा असतो. पण असं एक ठिकाण आहे जिथे स्नान केल्यावर अकाली मृत्यू येत नाही असं शास्त्र सांगत. कुठे आहे हे ठिकाण जाणून घ्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 07, 2026 | 04:27 PM
‘असं’ एक ठिकाण जिथे अंघोळ केल्याने येत नाही अकाली मृत्यू ; काय आहे याचं रहस्य ?
Follow Us
Close
Follow Us:
  • ‘असं’ एक ठिकाण जिथे अंघोळ केल्याने येत नाही अकाली मृत्यू
  • काय आहे याचं रहस्य ?
Yamunotri Dham :मृत्यू म्हटलं की प्रत्येकाला धडकी भरते.आपला असो की आपल्या जवळच्यांचा मृत्यू हा कायमच त्रास देणारा असतो. पण असं एक ठिकाण आहे जिथे स्नान केल्यावर अकाली मृत्यू येत नाही असं शास्त्र सांगत. कुठे आहे हे ठिकाण जाणून घ्या.

हिंदू धर्मात यमुनोत्री या ठिकाणाचं पावित्र्य मोठं आहे. असं म्हणतात यमुना ही सूर्यदेवांची कन्या आणि शनीदेव, यमराज यांची बहिण. यमुनादेवी ही शांततेचं प्रतीक मानलं जातं, स्कंदपुरणानुसार, अशी मान्यता आहे की, यमुनेच्या पाण्यात अंघोळ केल्याने अकाली मृत्यू येत नाही. या ठिकाणी स्नान केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला कमी वयात मृत्यू येऊच शकत नाही इतकं पावित्र्य या यमुनेच्या पाण्यात आहे असं म्हटलं जातं.

यमुनोत्री धाम हे उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात वसलेले अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. चारधाम यात्रेतील हे पहिलं ठिकाण म्हटलं जातं. . ३,२९३ मीटर उंचीवर यमुनोत्री धाम असून यमुनेच्या उगमस्थानी आहे आणि देवी यमुनेला समर्पित आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा डोळ्यांचं पारणं फेडतो. अशी माहिती आहे की, गढवालच्या राणीने या मंदिराची भव्य वास्तुकला केली.जरी या ठिकाणी चढणं आव्हानात्मक असली तरी, सभोवतालचे निसर्ग सौंदर्य आणि आध्यात्मिक वातावरणाने थकवा निघून जातो असं भाविक सांगतात.

Chanakyaniti : सर्वात कमी बोलणारी माणसं का करतात जगावर राज्य ? चाणक्यांनी दिलं मुद्देसूत उत्तर

यमुनोत्री धामची 5 न उलगडलेली आणि रंजक रहस्ये

यमुनोत्रीचा महिमा : यमुनोत्रीचे पाणी केवळ एक नदीचा प्रवाह नसून, ते भक्तांसाठी तीर्थ आहे. काही दंतकथेनुसार, या पाण्यात स्नान केल्याने केवळ पापांचा नाश होत नाही, तर मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धीही लाभते.

प्राचीन वास्तुकला – यमुनोत्री मंदिर संकुलातील अनेक लहान मंदिरं अत्यंत प्राचीन आहेत.स्थानिक आख्यायिकांनुसार, ही मंदिरं सत्ययुगातील आहेत. या मंदिरांची वास्तुकला आणि भगवान शिव व यमुना यांच्यातील अतूट नात्याच्या कथा आजही जिज्ञासू पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

सोन्यासारखा हिमालय – प्राचीन लोककथांमध्ये या प्रदेशाला सुवर्ण हिमालय म्हणून संबोधले जाते. असे मानले जाते की, प्राचीन काळी येथील शिखरे सोन्यासारखी चमकत असे आणि ती देवांचे निवासस्थान होते. आजही, जेव्हा सूर्याची पहिली किरणे या शिखरांवर पडतात, तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.प्राचीन लोककथांमध्ये या प्रदेशाला सुवर्ण हिमालय म्हणून ओळखलं जातं.

सूर्यकुंड – यमुनोत्रीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सूर्यकुंड. कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टीमध्येही, या तलावात उष्ण पाण्याचे झरे आहेत.

खरसाली- हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे जेव्हा मुख्य मंदिराचे दरवाजे बंद असतात, तेव्हा या गावात यमुना मातेची पूजा केली जाते. येथील प्राचीन शिवमंदिर त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे.

हनुमान चट्टी – गंगा आणि यमुना यांच्या संगमावर वसलेले हे ठिकाण शांतीचे प्रतीक आहे. भगवान हनुमानाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय यमुनोत्रीची तीर्थयात्रा अपूर्ण मानली जाते.

डोडीताल – हे सरोवर निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच ठरते. असं म्हणतात की, गणपती देवाचं जन्मस्थान मानले जाणारे हे सरोवर घनदाट जंगलांमध्ये वसलेले आहे.

विज्ञानालाही उलगडलं नाही कोडं; आरती सुरु होताच भूत,करणीबाधित लोक होतात बरे, काय आहे या देवस्थानाचं रहस्य

Web Title: Char dham yatra yamunotri dham where bathing does not cause premature death what is the secret

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • himalaya
  • hindu religion

संबंधित बातम्या

Chanakyaniti : सर्वात कमी बोलणारी माणसं का करतात जगावर राज्य ? चाणक्यांनी दिलं मुद्देसूत उत्तर
1

Chanakyaniti : सर्वात कमी बोलणारी माणसं का करतात जगावर राज्य ? चाणक्यांनी दिलं मुद्देसूत उत्तर

समुद्र मंथनाच्या वेळी असं काही घडलं की भगवान विष्णूंनी केला शिरच्छेद ; राहू केतूची ‘ही’ पुराणकथा तुम्हाला माहितेय का ?
2

समुद्र मंथनाच्या वेळी असं काही घडलं की भगवान विष्णूंनी केला शिरच्छेद ; राहू केतूची ‘ही’ पुराणकथा तुम्हाला माहितेय का ?

Rahu Ketu: आता पैसाच पैसा! राहू-केतूची होणार कृपादृष्टी; ‘या’ चार राशींचं फळफळणार नशीब
3

Rahu Ketu: आता पैसाच पैसा! राहू-केतूची होणार कृपादृष्टी; ‘या’ चार राशींचं फळफळणार नशीब

Varuthini Ekadashi: 12 की 13 एप्रिल कधी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
4

Varuthini Ekadashi: 12 की 13 एप्रिल कधी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.