Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025 : दिवाळीतल्या अभ्यंगस्नानाला इतकं महत्व का दिलं जातं ? काय आहे शास्त्रीय आणि धार्मिक कारणं

दिवाळीतील अभ्यंगस्नान ही केवळ परंपरा नाही, तर ती शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करणारा एक पवित्र विधी आहे, असं म्हटलं जातं.यामागे शास्त्रीय, आरोग्यदायी आणि आध्यात्मिक कारणं आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 19, 2025 | 05:34 PM
Diwali 2025 : दिवाळीतल्या अभ्यंगस्नानाला इतकं महत्व का दिलं जातं ? काय आहे शास्त्रीय आणि धार्मिक कारणं
Follow Us
Follow Us:
  • दिवाळीतल्या अभ्यंगस्नानाला इतकं महत्व का दिलं जातं ?
  • दिवाळीतच अभ्यंगस्नान का करतात ?
  • काय आहे शास्त्रीय आणि धार्मिक कारणं?
फराळ, रांगोळी यांप्रमाणेच महत्व आहे ते अभ्यंग स्नानाला. दिवाळीची पहिली अंघोळ याला हिंदू धर्मात शुभ मानलं जातं. याचे अध्यात्मिक आणि शास्त्रीयदृष्टीकोन देखील आहे. भारतीय संस्कृती आणि सणवार हे ऋतूचक्रावर आधारित आहेत. दिवाळीतच अभ्यंगस्नान का करतात याबाबत जाणून घेऊयात.दिवाळीतील अभ्यंगस्नान ही केवळ परंपरा नाही, तर ती शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करणारा एक पवित्र विधी आहे, असं म्हटलं जातं.यामागे शास्त्रीय, आरोग्यदायी आणि आध्यात्मिक कारणं आहेत.

Diwali 2025 : काय सांगता ? देशातील एकमेव राज्य जिथे दिवाळी साजरी होत नाही, कारण जाणून चक्रावून जाल

शास्त्रीय दृष्टिकोन:

अभ्यंगस्नानाचा उल्लेख आयुर्वेदात “स्नेह स्नान” म्हणून देखील केला आहे. दिवाळीच्या काळात हवामान बदलतं शरद ऋतूची चाहूल लागून थंडीची सुरुवात होते, त्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्या वेळी शरीरावर तिळाचं, नारळाचं किंवा बदामाचं तेल लावून स्नान करणं म्हणजे पारंपरिक पद्धतीने दिवाळीत एका अर्थी स्कीन केअर करण्यासारखं आहे. तेलाने केलेल्या मसाजमुळे त्वचेला पोषण मिळतं. शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंना बळकटी मिळते. तिळाचं तेल ऊष्ण गुणधर्माचं असल्याने थंडीपासून शरीराचं संरक्षण होतं.

धार्मिक आणि सांस्कृतिक कारणं:

दिवाळीच्या नरकचतुर्दशीच्या दिवशी केलेलं अभ्यंगस्नान हे पवित्र मानलं जातं. असं मानलं जातं की, या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि नवीन वर्षाच्या आरंभाला शुद्धता लाभते. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी नरकासुराचा वध करून लोकांना भयमुक्त केलं. त्यामुळे अभ्यंगस्नान हे पाप आणि दुःख नष्ट करून आनंद व समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. दिवाळी म्हणजे नरकासूरावर विजय मिळवून साजरा करण्यात येणारा दिवस. त्यामुळे या दिवशी पहाटे उठून अंघोळ करणं शुभ मानलं जातं.

Diwali 2025: “स्वराज्याचा थाटच न्यारा”;शिवरायांच्या काळात ‘अशी’ व्हायची दिवाळी साजरी

मानसिक आणि आध्यात्मिक फायदे:

अभ्यंगस्नानानंतर शरीर ताजंतवानं होतं, मन प्रसन्न राहतं आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिवसभरासाठी उत्साह, आत्मविश्वास आणि शांततेची भावना टिकते.अभ्यंगस्नान हे आरोग्य, सौंदर्य आणि अध्यात्म यांचं सुंदर मिश्रण आहे, म्हणूनच दिवाळीच्या सकाळीचं हे स्नान “शुभारंभ” मानलं जातं.अभ्यंगस्नान हे फक्त शरीर शुद्ध करणं नाही, तर मनाचं देखील शुद्धीकरण केलं जातं. तेल मालिश आणि उटणं लावल्याने शरीराला उब मिळते, सुगंध मेंदूला प्रसन्न ठेवतो आणि सणाची सुरुवात आनंदाने होते. या प्रक्रियेनंतर नवीन वस्त्र परिधान करणं म्हणजे जुन्या उर्जेचा त्याग आणि नवीन सकारात्मक उर्जेचं स्वागत. याचकारणाने : दिवाळीतल्या अभ्यंगस्नानाला इतकं महत्व अध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टीकोनातून दिलं जातं.

Web Title: Diwali 2025diwali 2025 why is so much importance given to ablution during diwali what are the scientific and religious reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • helathy lifestyle
  • hindu religion

संबंधित बातम्या

Mahadev Trishul: त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये दडले आहेत ‘हे’ गूढ अर्थ; जाणून घ्या शिवस्वरूपाचे रहस्य
1

Mahadev Trishul: त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये दडले आहेत ‘हे’ गूढ अर्थ; जाणून घ्या शिवस्वरूपाचे रहस्य

Shivlilamrut: काय आहे शिवलीलामृताचा कळसाध्याय? श्रियाळ-चांगुणाच्या भक्तीची हृदयस्पर्शी कथा
2

Shivlilamrut: काय आहे शिवलीलामृताचा कळसाध्याय? श्रियाळ-चांगुणाच्या भक्तीची हृदयस्पर्शी कथा

Janmashtami 2026: जन्माष्टमीपूर्वी घरात आणा या वस्तू, नांदेल सुख-शांती आणि समृद्धी
3

Janmashtami 2026: जन्माष्टमीपूर्वी घरात आणा या वस्तू, नांदेल सुख-शांती आणि समृद्धी

Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग
4

Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.