
फोटो सौजन्य- pinterest
साईबाबा हे महाराष्ट्रातील शिर्डीचे महान संत मानले जातात. आज देशभरातून लाखो भक्त शिर्डीत दर्शनासाठी येतात. साईबाबांच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा, चमत्कार आणि दंतकथा प्रसिद्ध आहेत. मात्र साईबाबा प्रथम शिर्डीत कसे आले आणि “द्वारकामाई” या नावामागचा अर्थ काय आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिक एक ही दोन वाक्य ऐकली की आठवतात साईबाबा. शिर्डी हे साईबाबांचे प्रमुख स्थान मानलं जातं. पण याच शिर्डीमध्ये साईबाबा कसे प्रकटले हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया
साईबाबा फक्त हे साधे फकीर नाही तर त्यांच्यात एक दैवी शक्ती होती. साईंच्या जन्माबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे एकदा शिर्डीगावात एक मुलगा आला. हा मुलगा कोण, त्याचा धर्म काय, त्याचे आई वडील कोण याची गावकऱ्यांना काहीच माहिती नव्हती. हा मुलगा कित्येक वर्ष कडूलिंबाच्या झाडाखाली तपश्चर्येला बसायचा. एकदा जेव्हा तो तपश्चर्येला बसला तेव्हा कडुलिंबाच्या झाडाभोवती एक तेज निर्माण झालं. त्यावेळी गावकऱ्यांना असं वाटलं हा कोणी साधा मुलगा नाही, याच्यात काहीतरी दैवी शक्ती असावी. काही दिवसांनी हा मुलगा शिर्डीतून गायब झाला. एव्हाना गावकरी त्याला विसरले देखील होते.
कालांतराने शिर्डीत एका फकिराचं आगमन झालं. पांढरे कपडे, हातात काठी असा त्याचा वेश होता आणि हेच होते साईबाबा. जेव्हा साई शिर्डीतल्या खंडोबा मंदिराकडे जायला निघाले तेव्हा मंदिराजवळ असलेल्या पुजारींना या फकिरामध्ये दैवी शक्ती दिसली. साईंनी शिर्डीत जेव्हा पुन्हा पाऊल ठेवलं तेव्हा ते एका मोडकळीला आलेल्या मशिदीत राहू लागले त्यांनी त्या जागेला द्वारकामाई असं नावं दिलं. द्वारका म्हणजे कृष्णाचं स्थान आणि माई म्हणजे आई.
त्याकाळी हिंदू मुस्लिम वाद खूप मोठा होता. पण त्याच काळात साईंनी दोन्ही धर्मांना समानतेचा संदेश दिला. त्या काळात हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये मोठे मतभेद होते. मात्र साईबाबांनी दोन्ही धर्मांना समान मानले. ते “सबका मालिक एक” हा संदेश देत असत.द्वारकामाईमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांचे लोक एकत्र येऊन प्रार्थना करत असत. त्यामुळे साईबाबा हे धार्मिक ऐक्य आणि मानवतेचे प्रतीक मानले जातात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: दंतकथेनुसार, साईबाबा प्रथम तरुण वयात शिर्डीत आले होते. काही काळ त्यांनी कडुलिंबाच्या झाडाखाली तपश्चर्या केली आणि नंतर काही वर्षांनी फकिराच्या वेशात पुन्हा शिर्डीत परतले.
Ans: साईबाबा ज्या जुन्या मशिदीत राहत होते, त्या जागेला त्यांनी “द्वारकामाई” असे नाव दिले. हे आज शिर्डीतील अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते.
Ans: “द्वारका” म्हणजे श्रीकृष्ण यांचे पवित्र स्थान आणि “माई” म्हणजे आई. भक्तांना आधार देणारी आणि संरक्षण करणारी जागा असा याचा अर्थ मानला जातो.