
फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे आणि हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. ही एकादशी खूप फायदेशीर मानली जाते. या दिवशी व्रत, दान आणि पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात. या एकादशीला फलदा एकादशी या नावाने ओळखले जाते.
कामदा एकादशी रविवार, 29 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. ज्याला फलदा एकादशी असे म्हणतात. याचा उल्लेख विष्णुपुराणात देखील सापडतो आणि हे व्रत सर्व इच्छा पूर्ण करणारे मानले जाते. श्रीरामनवमीनंतर येणारी पहिली एकादशी मानली जाते. त्यामुळे याचे महत्त्व अजून वाढलेले असते. माझ्याशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा करणे आणि व्रत ठेवल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख शांती राहते. राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या
मेष राशींच्या लोकांनी कामदा एकादशीला ज्ञानगंगांची मिठाई, लाल फळ आणि मसूर डाळीचे दान करणे शुभ राहील.
वृषभ राशीचे लोकांनी तांदूळ, गहू, साखर आणि दुधाचे दान केल्याने फायदा होतो.
मिथुन राशीच्या लोकांनी एकादशीला गाईला चारा खायला द्या आणि हिरव्या भाज्यांचे दान करा त्यामुळे पुण्य मिळते
कर्क राशींच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी लोणी, मिश्री, लस्सी आणि ताक याचे दान करणे फायदेशीर मानले जाते.
सिंह राशींच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेनंतर लाल फळ आणि सरबत लोकांमध्ये वाटावे.
कन्या राशींच्या लोकांनी विवाहित महिलांना हिरव्या रंगांच्या बांगड्याचे दान करणे शुभ मानले जाते.
एकादशीच्या दिवशी तुळशीच्या लोकांनी गरजूवंतांना पांढऱ्या वस्त्राचे दान करणे शुभ मानले जाते.
वृश्चिक राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी मसूर डाळ, लाल मिरची आणि लाल फळांचे दान करणे फायदेशीर मानले जाते.
धनु राशींच्या लोकांनी एकादशीला केसर मिसळलेले दूध आणि पिवळी फळे दान करणे शुभ मानले जाते.
या राशींच्या लोकांनी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच गरिबांना धनाचे दान करावे.
कुंभ राशीचे लोक असे एकादशीला चप्पल बूट, छत्री आणि काळ्या वस्त्राचे दान करणे शुभ मानले जाते.
एकादशीच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी केळ, चण्याची डाळ, बेसन आणि पिवळ्या वस्त्राचे दान करणे शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: कामदा एकादशी ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि इच्छापूर्ती होते, असे मानले जाते.
Ans: दान केल्याने पुण्य मिळते आणि नकारात्मक कर्मांचा प्रभाव कमी होतो. तसेच विष्णू-लक्ष्मीची कृपा मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Ans: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असतो. राशीनुसार दान केल्यास त्या ग्रहांचे दोष कमी होतात आणि सकारात्मक परिणाम मिळतात.