
फोटो सौजन्य- pinterest
महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा मानला जातो. यंदा रविवार, 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास, रुद्राभिषेक, पूजा आणि रात्रभर जागरण केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची मनोभावे आराधना केल्याने महादेवांची कृपादृष्टी लाभते आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये काय आहे कथा जाणून घ्या
पुराणातील कथेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. समुद्रमंथातून अनेक महत्त्वाच्या गोष्टींची निर्मिती झाली. परंतु याच समुद्रमंथनातून हालाहल विषदेखील बाहेर आले. या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शंकरामध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हालाहल विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले. पण हे विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठा निळा झाला आणि संपूर्ण देहाचा दाह होऊ लागला. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला त्यांचा सर्व देवांनी भगवान शिवांना बरं वाटावं म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे देखील भगवान शिवांनी तांडव नृत्य केले. सकाळी महादेवांना बरे वाटले त्यानंतर त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनेमुळे सृष्टी वाचली म्हणूनच या दिवसाला महाशिवरात्री असे म्हणतात.
महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवाचे शिवलिलामृत महारूद्र, भजन, गायन इत्यादींचे आयोजन केले जाते. भगवा शिवांचे दर्शन घेऊन आशीर्वाद मिळविण्यासाठी आराधना केली जाते. भगवान शिवांच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते. बारा ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी जमतात.
भगवान शिवांचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तेथे तेथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरवल्या जातात. शिवशंकराला 108 बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटेधोतराचे फूल भगवान शंकरांना वाहण्याची पद्धत देखील आहे. भगवान शिवाला भोळा शंकर असे देखील म्हटले जाते. उपासना केल्यानंतर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांच कल्याण करणारा आहे, असे म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: भगवान शिव यांच्या उपासनेसाठी आणि त्यांच्या तांडव, तपश्चर्या व करुणेची आठवण ठेवण्यासाठी महाशिवरात्री साजरी केली जाते.
Ans: महाशिवरात्रीचे महत्त्व शिव पुराण आणि लिंग पुराणामध्ये वर्णन केले आहे.
Ans: समुद्र मंथनावेळी निघालेल्या विषाचे पान करून शिवांनी विश्वाचे रक्षण केले. त्यामुळे त्यांना ‘नीलकंठ’ म्हणतात आणि हा त्याग स्मरणात ठेवण्यासाठी हा दिवस पवित्र मानला जातो.