Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan 2026: देवाला राखी का बांधली जाते? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा

रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ नसल्यास निराश होण्याची गरज नाही. कारण या दिवशी तुम्ही भगवान श्रीकृष्ण, गणपती, हनुमान, महादेव किंवा भगवान विष्णूंना राखी अर्पण करून त्यांच्या चरणी संरक्षण आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करू शकता. रक्षाबंधनाच्या दिवशी देवतांना राखी बांधण्याची काय आहे परंपरा जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 28, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • रक्षाबंधनाला देवाला राखी अर्पण करण्याची धार्मिक परंपरा
  • देवाला राखी अर्पण करण्यापूर्वी पूजा आणि प्रार्थना करण्याची पद्धत
  • अक्षता-कुंकू वाहून मनोभावे राखी अर्पण करण्याची परंपरा
 

रक्षाबंधनाचा सण शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या सणांची देशभरात आतुरतेने वाट पाहिली जाते. रक्षाबंधनाचा सण भाऊ बहिणींच्या नात्यामधील प्रेमाचा आणि पवित्र्याचा सण मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात. या दिवशी राखी बांधण्याशी संबंधित अनेक धार्मिक परंपरा आहेत. मात्र काही कुटुंबांमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम भगवान गणेशाला राखी बांधण्याची परंपरा आहे.

देवाला राखी बांधण्याला एक प्रतीकात्मक महत्त्व आहे, जे आपण स्वतःला देवाला समर्पित करत असल्याचे दर्शवते. भक्तगण देवाच्या मूर्तीला राखी बांधून आपले प्रेम आणि भक्ती व्यक्त करतात आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी व शांतीसाठी प्रार्थना करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी देवतांना राखी बांधण्याची काय आहे परंपरा जाणून घेऊया

रक्षाबंधनाच्या दिवशी या देवतांना बांधावी राखी

रक्षाबंधनाच्या पवित्र सणांच्या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात. मात्र ज्यांना भाऊ नाही आहे त्या बहिणी निराश होतात आणि कोणाला राखी बांधायची या विचारात पडतात. पण निराश होण्याची गरज नाही, कारण या शुभप्रसंगी पाच देवतांना राखी बांधून तुम्ही हा सण साजरा करू शकता.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी तयार होत आहे अद्भुत त्रिवेणी संगम, ‘या’ शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यास भावाचे चमकेल नशीब

भगवान श्रीकृष्ण

भगवान श्रीकृष्ण हे प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जातात. त्यांचे आणि द्रौपदीचे राखीचे नातेही होते. द्रौपदीने त्यांना कापडाची राखी बांधली आणि त्या बदल्यात, कृष्णाने तिचा भाऊ बनून तिच्या सन्मानाचे रक्षण केले. म्हणूनच, अनेक बहिणी कृष्णाला आपला भाऊ मानून त्याला राखी बांधतात. कृष्णाला पिवळ्या, निळ्या किंवा मोरपंखी रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या कथेशी राखीचा संबंध जोडला जातो. द्रौपदीने कृष्णाच्या हाताला जखम झाल्यावर आपल्या साडीचा पदर फाडून तो बांधला, अशी प्रसिद्ध कथा आहे. त्यामुळे कृष्णाला राखी अर्पण करण्याची परंपरा काही ठिकाणी आढळते.

भगवान गणेश

गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी गणेशाला राखी अर्पण करून संकटांपासून संरक्षण आणि शुभत्वाची प्रार्थना केली जाते. जर तुम्ही गणेशाला राखी अर्पण करत असाल, तर त्यांना लाल किंवा पिवळी राखी अर्पण करा. लाल रंग शक्ती, उत्साह आणि शुभतेचे प्रतीक आहे, तर पिवळा रंग ज्ञान आणि शुभतेशी संबंधित आहे.

भगवान हनुमान

हनुमानाला शक्ती, धैर्य आणि संकटमोचक देवता मानले जाते. त्यामुळे त्यांना राखी अर्पण करून धैर्य आणि संकटांपासून संरक्षण मिळावे, अशी श्रद्धा आहे. लाल आणि केशरी रंगांचा भगवान हनुमानाशी एक विशेष धार्मिक संबंध आहे. लाल रंग ऊर्जा आणि धैर्याचे प्रतीक आहे. त्यामुळे, भगवान हनुमानाला लाल किंवा केशरी रंगाची राखी अर्पण करणे शुभ मानले जाते.

Avoid gifts on Raksha Bandhan: बहिणीसाठी राखीचं गिफ्ट घेताय? ‘या’ ५ वस्तू चुकूनही देऊ नका!

महादेव

भगवान शिव हे रक्षण आणि कल्याणाचे प्रतीक मानले जातात. काही भक्त रक्षाबंधनाच्या दिवशी शिवलिंग किंवा शिवप्रतिमेसमोर राखी अर्पण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. महादेवांची पूजा कौटुंबिक संरक्षण आणि शांतीसाठी केली जाते. त्यांचा संबंध पांढऱ्या रंगाशी जोडला जातो. पांढरा रंग शांती, पवित्रता आणि अलिप्ततेचे प्रतीक आहे. त्यामुळे, त्यांना पांढऱ्या, लाल किंवा रुद्राक्षाच्या माळा अर्पण करणे शुभ मानले जाते. काही परंपरांमध्ये, लाल धाग्याचा वापर संरक्षक धागा म्हणूनही केला जातो.

भगवान विष्णू

भगवान विष्णूंना पालनकर्ता आणि रक्षक मानले जाते. त्यामुळे विष्णूंना राखी अर्पण करून जीवनात संरक्षण, स्थैर्य आणि सुख-समृद्धी मिळावी, अशी धार्मिक भावना व्यक्त केली जाते. भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो. पिवळा रंग ज्ञान, समृद्धी, नीतिमत्ता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे, रक्षाबंधनाला भगवान विष्णूंना पिवळी किंवा सोन्याची राखी अर्पण करणे शुभ मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Raksha bandhan 2026 why is rakhi tied to god what is the tradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • hindu religion
  • Raksha Bandhan

संबंधित बातम्या

Rakshabandhan: व्हिडिओ कॉलवर औक्षण अन् UPI वर ‘राखीचं गिफ्ट’; भावंडांचा डिजिटल रक्षाबंधनाचा नवा ट्रेंड
1

Rakshabandhan: व्हिडिओ कॉलवर औक्षण अन् UPI वर ‘राखीचं गिफ्ट’; भावंडांचा डिजिटल रक्षाबंधनाचा नवा ट्रेंड

Sankashti Chaturthi: हेरंबा संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
2

Sankashti Chaturthi: हेरंबा संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Navnath Bhaktisar: नवनाथ भक्तिसाराचे पारायण श्रावणात का केले जाते? जाणून घ्या महत्त्व आणि नियम
3

Navnath Bhaktisar: नवनाथ भक्तिसाराचे पारायण श्रावणात का केले जाते? जाणून घ्या महत्त्व आणि नियम

Saibaba Story: साईबाबा आणि चांदभाई यांची पहिली भेट कशी झाली? हरवलेल्या घोडीची रंजक कथा
4

Saibaba Story: साईबाबा आणि चांदभाई यांची पहिली भेट कशी झाली? हरवलेल्या घोडीची रंजक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.