
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात आणि पौराणिक कथेनुसार, आठ व्यक्तींना चिरंजीवी (अमर) मानले गेले आहे, जे कल्पोक्ल्पान्तर पृथ्वीवर जिवंत राहतील. सकाळी उठून या आठ जणांचे स्मरण केल्याने आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते अशी मान्यता आहे.
अश्वत्थामा बलिव्यासो हनूमांश्च विभीषण:।कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:।।सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।
हनुमान यांना “चिरंजीवी” म्हटले जाते, कारण हिंदू धर्मग्रंथांनुसार ते आजही जिवंत असून पृथ्वीवर धर्मरक्षणासाठी कार्यरत आहेत. “चिरंजीवी” म्हणजे दीर्घकाळ किंवा युगानुयुगे जिवंत राहणारा. हनुमंत हे केवळ बल, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक नसून अमर भक्तीचे जिवंत उदाहरण मानले जातात.
रामायणानुसार, भगवान श्रीराम यांनी लंकेवरील विजय मिळवल्यानंतर हनुमंताच्या अतुलनीय सेवेमुळे त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. श्रीराम म्हणाले की, “जोपर्यंत पृथ्वीवर माझे नाव आणि रामकथा राहील, तोपर्यंत तूही जगात राहशील.” आजही ज्या ठिकाणी रामकथांचे आयोजन केले जाते तेथे हनुमानजींची मूर्ती ठेवली जाते. तर प्रत्यक्ष तेथे हनुमानजी रामकथा ऐकण्यासाठी येत असतात, असे श्रद्धाळू भक्तांची धारणा आहे. यामुळे हनुमंत हे रामभक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि धर्म टिकवण्यासाठी पृथ्वीवर सदैव उपस्थित राहतील, अशी श्रद्धा निर्माण झाली.
हनुमंत हे भगवान शिवांचे अंशावतार मानले जातात. त्यांच्या अंगी अद्भुत शक्ती, अपार ज्ञान आणि नम्रता होती. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही. त्यांची एकमेव इच्छा होती. श्रीरामांची सेवा. त्यांच्या या निस्वार्थ भक्तीमुळे देवतांनी त्यांना अनेक वरदान दिली होती:
कोणतेही अस्त्र-शस्त्र त्यांना इजा करू शकत नाही.
त्यांचे तेज आणि शक्ती कधीही कमी होणार नाही.
ते इच्छेनुसार रूप बदलू शकतात.
मृत्यू त्यांना स्पर्श करू शकत नाही.
म्हणूनच हनुमंत हे “अजर-अमर” मानले जातात.
हिंदू धर्मात सात महान चिरंजीवी मानले जातात:
अश्वत्थामा
महाबली
व्यास
हनुमान
विभीषण
कृपाचार्य
परशुराम
यांपैकी हनुमंत हे सर्वात लोकप्रिय आणि पूजनीय चिरंजीवी मानले जातात.
अनेक धार्मिक कथांमध्ये आणि लोकश्रद्धांमध्ये असे सांगितले जाते की, जिथे रामनामाचा जप होतो किंवा रामकथा सांगितली जाते, तिथे हनुमंत अदृश्य रूपाने उपस्थित असतात. त्यामुळे अनेक भक्त रामायण वाचनापूर्वी हनुमंताची पूजा करतात.
हनुमंताच्या जीवनातून आपल्याला काही महान संदेश मिळतात. अहंकाराशिवाय सेवा करणे. भक्तीमध्ये पूर्ण समर्पण ठेवणे, शक्तीचा उपयोग धर्मासाठी करणे, संकटात धैर्य न सोडणे, गुरु आणि ईश्वराप्रती निष्ठा ठेवणे. हनुमंताचे चिरंजीवीत्व हे केवळ शरीराने अमर राहणे नाही, तर त्यांच्या आदर्शांचे आणि भक्तीचे युगानुयुगे जिवंत राहणे आहे. हनुमान यांना चिरंजीवी म्हणण्यामागे त्यांच्या अतुलनीय भक्ती, पराक्रम आणि श्रीरामांनी दिलेला अमरत्वाचा आशीर्वाद हे मुख्य कारण आहे. हनुमंत हे भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, शक्ती आणि सेवाभावाचे अखंड प्रतीक आहेत. म्हणूनच आजही कोट्यवधी भक्त संकटाच्या वेळी “जय हनुमान” म्हणत त्यांचे स्मरण करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: रामायणानुसार भगवान श्रीरामांनी हनुमानांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला होता. त्यामुळे ते युगानुयुगे पृथ्वीवर धर्मरक्षणासाठी उपस्थित राहतील, अशी श्रद्धा आहे.
Ans: “चिरंजीवी” म्हणजे दीर्घकाळ किंवा युगानुयुगे जिवंत राहणारा. हिंदू धर्मात काही महान व्यक्तींना चिरंजीवी मानले जाते.
Ans: त्यांना कोणतेही अस्त्र-शस्त्र इजा करू शकत नाही, इच्छेनुसार रूप बदलण्याची शक्ती आणि अमरत्वाचे वरदान मिळाले होते.