Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हनुमानांना चिरंजीवी का म्हटले जाते? जाणून घ्या रामायणातील प्रसिद्ध कथा

भारताच्या प्रत्येक गावा खेड्यात शहरात ज्यांची शक्तीची उपासना म्हणून हनुमानाची भक्ती करतात. हनुमान हे आठ चिरंजीवांपैकी चौथे चिरंजीव. ते चिरंजीव कसे झाले, यामागे प्रसिद्ध कथा काय आहे ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 16, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • हनुमानांना चिरंजीवी का म्हटले जाते?
  • हनुमंताला चिरंजीवी होण्याचा वर कसा मिळाला?
  • हनुमानाचे अमरत्वामागील काय आहे कारण
 

हिंदू धर्मात आणि पौराणिक कथेनुसार, आठ व्यक्तींना चिरंजीवी (अमर) मानले गेले आहे, जे कल्पोक्ल्पान्तर पृथ्वीवर जिवंत राहतील. सकाळी उठून या आठ जणांचे स्मरण केल्याने आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते अशी मान्यता आहे.

अश्वत्थामा बलिव्यासो हनूमांश्च विभीषण:।कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:।।सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।

हनुमान यांना “चिरंजीवी” म्हटले जाते, कारण हिंदू धर्मग्रंथांनुसार ते आजही जिवंत असून पृथ्वीवर धर्मरक्षणासाठी कार्यरत आहेत. “चिरंजीवी” म्हणजे दीर्घकाळ किंवा युगानुयुगे जिवंत राहणारा. हनुमंत हे केवळ बल, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक नसून अमर भक्तीचे जिवंत उदाहरण मानले जातात.

Shani Amavasya: पितरांच्या आशीर्वादासाठी अमावस्या का मानली जाते खास, जाणून घ्या

हनुमंताला चिरंजीवी होण्याचा वर कसा मिळाला?

रामायणानुसार, भगवान श्रीराम यांनी लंकेवरील विजय मिळवल्यानंतर हनुमंताच्या अतुलनीय सेवेमुळे त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. श्रीराम म्हणाले की, “जोपर्यंत पृथ्वीवर माझे नाव आणि रामकथा राहील, तोपर्यंत तूही जगात राहशील.” आजही ज्या ठिकाणी रामकथांचे आयोजन केले जाते तेथे हनुमानजींची मूर्ती ठेवली जाते. तर प्रत्यक्ष तेथे हनुमानजी रामकथा ऐकण्यासाठी येत असतात, असे श्रद्धाळू भक्तांची धारणा आहे. यामुळे हनुमंत हे रामभक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि धर्म टिकवण्यासाठी पृथ्वीवर सदैव उपस्थित राहतील, अशी श्रद्धा निर्माण झाली.

हनुमंताचे अमरत्व आणि त्यामागील कारण

हनुमंत हे भगवान शिवांचे अंशावतार मानले जातात. त्यांच्या अंगी अद्भुत शक्ती, अपार ज्ञान आणि नम्रता होती. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही. त्यांची एकमेव इच्छा होती. श्रीरामांची सेवा. त्यांच्या या निस्वार्थ भक्तीमुळे देवतांनी त्यांना अनेक वरदान दिली होती:

कोणतेही अस्त्र-शस्त्र त्यांना इजा करू शकत नाही.

त्यांचे तेज आणि शक्ती कधीही कमी होणार नाही.

ते इच्छेनुसार रूप बदलू शकतात.

मृत्यू त्यांना स्पर्श करू शकत नाही.

म्हणूनच हनुमंत हे “अजर-अमर” मानले जातात.

सप्तचिरंजीवींमध्ये हनुमंत

हिंदू धर्मात सात महान चिरंजीवी मानले जातात:

अश्वत्थामा

महाबली

व्यास

हनुमान

विभीषण

कृपाचार्य

परशुराम

यांपैकी हनुमंत हे सर्वात लोकप्रिय आणि पूजनीय चिरंजीवी मानले जातात.

Jupiter Transit: जून महिन्यात गुरू ग्रह बदलणार आपले मार्गक्रमण, या राशींच्या लोकांचे उजळणार नशीब

हनुमंत आजही पृथ्वीवर आहेत का?

अनेक धार्मिक कथांमध्ये आणि लोकश्रद्धांमध्ये असे सांगितले जाते की, जिथे रामनामाचा जप होतो किंवा रामकथा सांगितली जाते, तिथे हनुमंत अदृश्य रूपाने उपस्थित असतात. त्यामुळे अनेक भक्त रामायण वाचनापूर्वी हनुमंताची पूजा करतात.

हनुमंताच्या चिरंजीवीत्वाचा संदेश

हनुमंताच्या जीवनातून आपल्याला काही महान संदेश मिळतात. अहंकाराशिवाय सेवा करणे. भक्तीमध्ये पूर्ण समर्पण ठेवणे, शक्तीचा उपयोग धर्मासाठी करणे, संकटात धैर्य न सोडणे, गुरु आणि ईश्वराप्रती निष्ठा ठेवणे. हनुमंताचे चिरंजीवीत्व हे केवळ शरीराने अमर राहणे नाही, तर त्यांच्या आदर्शांचे आणि भक्तीचे युगानुयुगे जिवंत राहणे आहे. हनुमान यांना चिरंजीवी म्हणण्यामागे त्यांच्या अतुलनीय भक्ती, पराक्रम आणि श्रीरामांनी दिलेला अमरत्वाचा आशीर्वाद हे मुख्य कारण आहे. हनुमंत हे भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, शक्ती आणि सेवाभावाचे अखंड प्रतीक आहेत. म्हणूनच आजही कोट्यवधी भक्त संकटाच्या वेळी “जय हनुमान” म्हणत त्यांचे स्मरण करतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हनुमानांना चिरंजीवी का म्हटले जाते?

    Ans: रामायणानुसार भगवान श्रीरामांनी हनुमानांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला होता. त्यामुळे ते युगानुयुगे पृथ्वीवर धर्मरक्षणासाठी उपस्थित राहतील, अशी श्रद्धा आहे.

  • Que: चिरंजीवी” म्हणजे काय?

    Ans: “चिरंजीवी” म्हणजे दीर्घकाळ किंवा युगानुयुगे जिवंत राहणारा. हिंदू धर्मात काही महान व्यक्तींना चिरंजीवी मानले जाते.

  • Que: हनुमानांना कोणकोणती वरदाने मिळाली होती?

    Ans: त्यांना कोणतेही अस्त्र-शस्त्र इजा करू शकत नाही, इच्छेनुसार रूप बदलण्याची शक्ती आणि अमरत्वाचे वरदान मिळाले होते.

Web Title: Ramayana hindu religion dharm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Hanuman Puja
  • hindu religion
  • Ramayana

संबंधित बातम्या

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
1

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण
2

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या
4

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.