
फोटो सौजन्य- pinterest
शामा हा साईबाबांचा एकनिष्ठ भक्त होता. साईबाबा नेहमी म्हणायचे ते आणि शामा अनेक जन्मांपासून एकमेंकाशी जोडलेले आहेत. एकदा संध्याकाळी शामाला एका विषारी सापाने बोटाला दंश केला. सापाच्या दंशाचा हळूहळू परिणाम होऊ लागता शामा वेदनेने ओरडू लागला मृत्यू जवळ आला आहे या विचाराने त्याची भीती अधिकच वाढली. शामाची ही अवस्था पाहून त्याच्या मित्रांनी त्याला विठ्ठोबा मंदिरात घेऊन जायचं ठरवलं. हे मंदिर शिर्डीजवळ होतं. जिथे सर्पदंश झालेल्यांना अशा वेदनांपासून मुक्ती मिळावी म्हणून नेलं जात असे. पण शामा आपल्या साईबाबांना भेटण्यासाठी मशिदीच्या दिशेने धावला.
जेव्हा साईबाबांनी शामाला दुरून येताना पाहिलं तेव्हा ते रागाने गर्जना करून म्हणाले, हे ब्राम्हणा तिथेच थांब सावध राहा. जर तू वर चढून येत असशील तर तिथेच राहा, खाली उतर. साईबाबांचा राग पाहून आणि त्यांचे शब्द ऐकून शामा आश्चर्यचकित झाला. तो बाबांना आपल्या जीवनाचा आधारस्तंभ मानत असे. म्हणून तो पूर्णपणे निराश होऊन तिथे बसला. थोड्यावेळाने जेव्हा बाबांचा राग शांत झाला आणि ते शांत झाले तेव्हा शामा जाऊन बाबांच्या बाजूला बसला त्याचे डोळे पाण्याने भरलेले होते. साईबाबा त्याला म्हणाले शामा घाबरू नको काळजी करण्यासारखे काहीच नाही. सरळ घरी जा शांत बस पण बाहेर जाऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी चिंता सोडून दे. मशिदीतला फकीर खूप द्याळू आहे तो तुला मरू देणार नाही. शामाला हायस वाटलं. शामाला घरी पाठवल्यानंतर बाबांनी तात्या आणि काकांना त्याच्या घरी पाठवलं. त्यांनी सांगितलं त्याने त्याला जे हवं ते खाव प्याव आणि घरात फिराव अजिबात झोपू नये. म्हणजे जागं राहावं.
बाबाचं प्रेम पाहून शामा निश्चिंत झाला आणि त्याने बाबांच्या आज्ञेचं काटेकोरपणे पालन केलं आणि सकाळपर्यंत जणू काही त्याचा पुर्नजन्मच झाला होता तो सकाळपर्यंत ठणठणीत बरा झाला होता. बाबांचे बाहेर ये खाली उतर हे शब्द शामाला उद्देशून नव्हते तर ते त्या सापाला आणि त्याच्या विषाला उद्देशून होते. तेव्हाचे ते विष निष्प्रभ झाले होते. बाबांनी असे हजारो चमत्कार केले आणि आपल्या भक्ताला साथ दिली.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शामा म्हणजेच माधवराव देशपांडे हे शिर्डीच्या साईबाबांचे अत्यंत जवळचे आणि एकनिष्ठ भक्त होते.
Ans: एकदा संध्याकाळच्या वेळी शामाला विषारी सापाने बोटाला दंश केला होता, अशी साईचरित्रातील प्रसिद्ध कथा आहे.
Ans: गुरूवरील श्रद्धा, संकटकाळात धैर्य आणि साईबाबांच्या कृपेवरील विश्वास यामुळे मोठ्या संकटांवर मात करता येते, हा या कथेचा मुख्य संदेश आहे.