फोटो सौजन्य- pinterest
शिर्डीत आल्यानंतर साईबाबांचे अनेक भक्त झाले होते. साईबाबा आणि त्यांचे परमभक्त माधवराव देशपांडे होते ज्यांना शामा या नावाने ओळखण्यात येतं. यांच्याशी संबंधित एकादशी आणि ज्वारीचं पोंक ही एक अतिशय सुंदर आणि बोध कथा आहे. या कथेवरून साईबाबांनी उपवासाच्या कर्मकांडापेक्षा गुरूची आज्ञा आणि भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे पटवून दिलं होतं. एकदा एकादशीच्या दिवशी कोणीतरी साईबाबांना गरमागरम ज्वारीची खीर पाठवली ही खीर ताज्या हिरव्या ज्वारीच्या दाण्यांना भाजून बनवली जाते.
पश्चिम भारतात सोक्या ज्वारीचा वापर लोटळ्या बनवण्यासाठी केला जात असे. ज्याला पोंक असंही म्हटलं जातं. साईबाबांनी माधवरावांना मूठभर खीर दिली आणि त्यांना ती खाण्यास सांगितले. माधवराव वैष्णव धर्माचे काटेकोर पालन करत आणि एकादशीचा उपवास करत असतं. साईबाबांनी दिलेले पोकं पाहून माधवरावांना राग आला आणि ते म्हणाले, देवा आज एकादशी आहे आणि तुम्ही मला खीर खायला सांगताय तुम्हाला कसे काही वाटत नाही मी हे पोंक खाणार नाही.
हे ऐकून जसे वडील आपल्या मुलाला प्रेमाने आणि आपुलकीने सांगतात तसंच साईबाबा म्हणाले ठीक आहे नको खाऊस. पण यावेळी शामा यांना बाबांनी शिकवण दिली. बाबांनी शामाला समजावलं की प्रत्यक्ष देव किंवा गुरू एखादी गोष्ट प्रसाद म्हणून देतो तेव्हा उपवासाचे नियम त्याच्या आड येऊ नयेत. गुरूची आज्ञा मानणं आणि तो प्रसाद ग्रहण करणं हे सर्वांत मोठं व्रत आहे.
या कथेतून बाबांनी बोध दिला की, बाह्य कर्मकांड आणि उपवासाच्या कडक नियमांपेक्षा गुरूवरील निष्ठा आणि श्रद्धा सबुरी जास्त महत्त्वाची असते. गुरूच्या हातातून मिळालेला प्रसाद कधीही नाकारायचा नसतो. मग तो कोणत्याही दिवशी मिळालेला असो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: साईबाबांनी शामाला एकादशीच्या दिवशी प्रसाद म्हणून काही खाद्यपदार्थ दिले होते. या प्रसंगातून गुरूने दिलेला प्रसाद श्रद्धेने स्वीकारण्याचा संदेश मिळतो.
Ans: गुरूचा प्रसाद हा केवळ अन्न नसून त्यामागे गुरूची कृपा आणि आशीर्वाद असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे तो नाकारू नये, असा आध्यात्मिक संदेश या कथेतून दिला जातो.
Ans: प्रसादाकडे देवाची किंवा गुरूची कृपा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे प्रसाद स्वीकारताना श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना ठेवण्याला महत्त्व दिले जाते.






