
फोटो सौजन्य- pinterest
रामरक्षास्तोत्र हे भगवान श्रीरामाचे संरक्षण कवच मानले जाते, जे मानसिक शांतता, भीतीपासून मुक्ती, संकट निवारण आणि शारीरिक आरोग्यासाठी दररोज किंवा विशेषतः मंगळवार-शनिवारी सकाळी/संध्याकाळी पूर्वेकडे तोंड करून वाचावे. चैत्र नवरात्रीत (गुढीपाडवा ते रामनवमी) दररोज पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. रामरक्षास्तोत्र आणि इतरही धर्मशास्त्रातील बाबी याबद्दल समजून घेऊ या..
बुध कौशिक ऋषी वाल्मिकी यांनी रामरक्षा स्तोत्र लिहिले. दरम्यान पौराणिक मान्यतेनुसार, असे मानले जाते की भगवान शिव वाल्मिकी ऋषींच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्यांनी राम स्तोत्राचे पठण केले. वाल्मिकीजी पहाटे उठले आणि त्यांनी संपूर्ण रामरक्षा स्तोत्र लिहिले. देववाणी हा स्रोत संस्कृतमध्ये उपलब्ध आहे. शुभ परिणाम आणि भगवान रामाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी रामस्त्रोत जप केला जाऊ शकतो. रामस्त्रोतचे यशस्वी पठण जातकाच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये यश आणि समृद्धी आणते. मात्र कामानुसार त्याच्या पद्धतीतही बदल दिसून येत आहेत. हे स्तोत्र 11 वेळा पठण करावे. श्री रामरक्षा स्तोत्राचे 11 वेळा पठण केल्यास त्याचा प्रभाव दिवसभर राहतो, असेही सांगितले जाते. राम स्तोत्राचा सतत 45 दिवस पठण केल्यास त्याचा प्रभाव दुप्पट होतो.
हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीचं विशेष असं महत्त्व आहे. या नऊ दिवसांत केलेल्या पूजा विधीचं चांगलं फळ मिळतं. रामरक्षा स्त्रोत सिद्ध करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमीपर्यंतच्या कालावधीला चैत्र नवरात्र किंवा रामनवरात्र असंही म्हंटलं जातं. रामरक्षा सर्वात प्रभावी स्तोत्र आहे. रामरक्षा पठणाने एक वेगळीच उर्जा आपल्याला मिळते. दररोज रामरक्षा म्हटल्याने प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङिगनौ ।रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥ हा श्लोक म्हणताना वेगळाच अनुभव येतो. इतकंच रामरक्षा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्यास सिद्ध होते. रामरक्षा अनुष्ठानाकरता चैत्र नवरात्री सर्वात उत्तम काळ आहे. रामरक्षा सिद्ध करण्यास उत्तम काळ असल्याचं धर्मशास्त्रात सांगितलं गेलं आहे. यंदा चैत्र नवरात्र 19 मार्च ते 27 मार्च या कालावधीत आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला सकाळी लवकर स्नान करू स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. कपाळाला टिळा लावावा. आराध्यदैवत गणपती, कुलदैवत, इष्ट देवता आणि आई वडिलांना नमस्कार करावा. त्यानंतर संकल्प सोडून रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं. रामरक्षा म्हणण्यापूर्वी एका जागी शांतपणे बसा. मनापासून श्रीरामांचं आव्हान करा. त्यानंतर रामरक्षा स्तोत्राचं पठण करा. नवरात्रीत नऊ दिवस देवाला नैवेद्य अर्पण करावा.
संरक्षण: हे स्तोत्र नकारात्मक ऊर्जा आणि संकटांपासून संरक्षण करते. नियमित वाचनाने जीवनातील अडथळे दूर होऊन सुख-समृद्धी लाभते. आपली मनोकामना पूर्ण होते. यामुळे मन शांत राहते आणि भक्तीने प्रभू रामाचे आशीर्वाद मिळतो. हे स्तोत्र वाचल्याने भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो. निर्भयता संचारते.
सकाळी स्नान करून किंवा संध्याकाळी विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी याचे पठण करावे. पूजेच्या ठिकाणी शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून दिवा लावून, शुद्ध उच्चारात श्रद्धेने पठण करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चैत्र नवरात्री हा साधना आणि भक्तीचा पवित्र काळ आहे. या काळात रामरक्षा स्तोत्र पठण केल्यास त्याचे फल अधिक मिळते असे मानले जाते.
Ans: मानसिक शांतता मिळते, भीती आणि नकारात्मकता दूर होते, संकटांपासून संरक्षण मिळते, आत्मविश्वास वाढतो, जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते
Ans: दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पठण करता येते. विशेषतः मंगळवार आणि शनिवार शुभ मानले जातात.