
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अत्यंत महत्त्व आहे. यंदा अधिक मासाची सुरुवात 17 मेपासून सुरू होत आहे आणि 15 जून रोजी त्याचा समारोप होणार आहे. साधारणपणे दर २ ते ३ वर्षांनी येणारा हा अधिक महिना चंद्र आणि सूर्य यांच्या कालगणनेतील तफावत भरून काढण्यासाठी जोडला जातो. अधिक मास म्हणजे काय? यावेळी जावयाला दीपदान का केले जाते ते जाणून घ्या
अधिक मास हा पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा मास म्हणून ओळखला जातो. अधिक मास हा काळ पुण्य काळ, व्रत वैकल्य आणि विशेष व्रत करण्याचा कालावधी असतो. अधिक मास हा विष्णू देवतेला समर्पित केला असल्यामुळेच याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात.
प्रत्येक मासात अर्थात महिन्यात सूर्य हा एकेका राशीत संक्रमण करत असतो. परंतु अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीमध्ये संक्रमण करत नाही. त्याचा परिणाम हा सूर्य आणि चंद्राच्या गतीवरती होतो त्यामुळेच वातावरणाचाही कायापालट होतो. वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर कोणतेही विपरित परिणाम होऊ नये, यामुळेच या काळात व्रत वैकल्य केले जातात. अधिक मासात व्रत वैकल्यांना खूप जास्त महत्त्व आहे. अधिक मासात करण्यासारखी अनेक व्रत वैकल्य आहेत. या मासात प्रतिदिन पुरुषोत्तम कृष्णांची पूजा आणि नामजप करावा.
या काळात दान करण्याचे देखील सांगितले जाते. त्यापैकी एक म्हणजे दीपदान. या दिवसात जावयाला घरी बोलवून त्याला दीपदान करण्याची पद्धत आहे. चांदी किंवा तांबे असे कोणत्याही धातूच्या दिव्याचे या दिवसात दान केले जाते. शिवाय याच काळात अन्नदानालाही महत्त्व असते. अधिक मासात वस्तू देण्यामागे ही काही कारणे आहेत. असे म्हणतात, देवी लक्ष्मीला चांदी ही अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीनारायणाचे रुप असलेला जावई आणि मुलगी यांना चांदी देणं अधिक योग्य मानलं जातं.
चांदीला धार्मिक कार्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं. चांदी ही सात्विक आहे. असं म्हणतात, भगवान शंकराच्या अश्रूपासून ज्या धातूची निर्मिती झाली ती म्हणजे चांदी. चांदी ही प्रेम, शांतता, शुक्र आणि चंद्र यांचे प्रतीक मानले जाते. चांदी ही शरीरातील पाणी आणि घटक दूर करते. शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता चांदीमध्येच असते. म्हणूनच या काळात चांदीची वस्तू दिली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: अधिक मास हा हिंदू पंचांगातील अतिरिक्त महिना आहे, जो साधारणपणे २–३ वर्षांनी येतो. चंद्र आणि सूर्य यांच्या कालगणनेतील तफावत भरून काढण्यासाठी हा महिना जोडला जातो.
Ans: या काळात केलेले दान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. यामुळे पापक्षय होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते.
Ans: दीपदान केल्याने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि जीवनात प्रकाश व सकारात्मकता येते असे मानले जाते.