
फोटो सौजन्य- pinterest
शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे आणि या दिवशी चंद्रग्रहण आहे. दरम्यान हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे येथे सूतक काळ पाळला जाणार नाही. मात्र, हे ग्रहण शनीच्या राशीत आणि राहू नक्षत्रात होत आहे. या दिवशी गरजूंना काही वस्तू दान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की ग्रहणानंतर दान केल्याने तुमचे भाग्य बळकट होते आणि तुमच्या जीवनातील नकारात्मकता कमी होऊ शकते. या काळात आपल्या राशीनुसार दान केल्याने ग्रहांची स्थिती देखील मजबूत होते. चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे ते जाणून घ्या
मेष राशींच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या दिवशी मसूर दान करावे. ज्योतिषशास्त्रानुसार मसूर दान केल्याने मंगळ ग्रहाशी संबंधित अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होते.
वृषभ राशींच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या दिवशी दूध किंवा साखर दान करू शकतात. असे मानले जाते की या वस्तू दान केल्याने मनःशांती मिळते आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.
मिथुन राशीच्या लोकांनी पुस्तक दान करणे शुभ मानले जाते. ज्योतिषाच्या मते, ज्ञानवृद्धी होते आणि बुध ग्रह बलवान होतो.
कर्क राशीच्या व्यक्तींनी चंद्रग्रहणाच्या दिवशी दान करावे. तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार गरजू लोकांना आर्थिक मदत करू शकता.
सिंह राशींच्या लोकांनी ग्रहणाच्या दिवशी मिठाईचे दान करावे. असे मानले जाते की यामुळे सकारात्मकता येते आणि रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळू शकते.
कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या भाज्यांचे दान करावे. गरजू लोकांना हिरव्या भाज्यांचे दान करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, यामुळे बुध ग्रह बलवान होतो आणि करिअर-संबंधित बाबींमध्ये लाभ मिळू शकतो.
तूळ राशीच्या लोकांनी तांदळाचे दान करावे. मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला तांदूळ दान करणे शुभ मानले जाते. यामुळे जीवनात आनंद आणि शांती येते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
वृश्चिक राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या दिवशी कपडे दान करावेत. यामुळे जीवनातील अडचणी कमी होऊ शकतात आणि त्यांचे भाग्य बळकट होऊ शकते.
धनु राशीचे लोक कपड्यांबरोबरच पैशांचेही दान करू शकतात. असे मानले जाते की यामुळे भाग्य बळकट होते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.
मकर राशीच्या लोकांनी काळ्या तिळाचे दान करावे. ज्योतिषशास्त्रानुसार, काळे तीळ दान केल्याने शनिशी संबंधित दुष्परिणाम शांत होण्यास मदत होते.
कुंभ राशीच्या लोकांनी पैसे दान करावेत. गरजू व्यक्तीला आर्थिक मदत करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल. असे मानले जाते की यामुळे तुमचे भाग्य बळकट होते आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात.
मीन राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाची मिठाई दान करावी. ज्योतिषशास्त्रानुसार, यामुळे गुरू ग्रहाचा आशीर्वाद मिळतो आणि सुदैव लाभते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणानंतर तांदूळ, दूध, दही, पांढरे कपडे, तूप आणि अन्न यांसारख्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते
Ans: हिंदू धार्मिक परंपरेनुसार दान केल्याने मनःशांती मिळते आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. हे धार्मिक विश्वास आहेत; त्यांना वैज्ञानिक आधार नाही
Ans: परंपरेनुसार ग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि पूजा स्थळाची स्वच्छता करून दान करावे, अशी पद्धत सांगितली जाते.