
शाळेत असताना प्रत्येकाला मुळाक्षरं शिकवली गेली आहेत पण आजही आपण अशी काही अक्षरं आहेत ज्यांचा उच्चार अगदी सुशिक्षित माणसं देखील चुकीचा करतात. ही अक्षरं म्हणजे ‘ष’ आणि ‘श’. या दोन्ही अक्षरांचा अर्थ वेगवेगळा जसा आहे तसंच त्यांचा उच्चार देखील वेगळा आहे. म्हणजे भाषा लिहिताना यातला ष हा पोटफोड्या ष आहे. लिहिताना तो ष असाच लिहिला जातो पण उच्चारताना मात्र या श चा उच्चार होतो. आता दोन्हीमध्ये खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. हा श म्हणजे शहामृगाचा ‘श’.
शहामृगातला ‘श’ उच्चारताना आपली जीभ टाळूला लागली जाते. याला तालव्य असं म्हणतात. तर पोटफोड्या ष उच्चारताना टाळूच्या कठीण भागाला जीभ लागते त्याला मूर्धन्य म्हणतात. श उच्चारताना तोंडावाटे निघणारा आवाज पातळ असतो तर ष उच्चारताना तोच आवाज जड होतो. श चा उच्चार हा मराठीत मोठ्या प्रमाणात वापरला जातो तर ष हे अक्षर हे संस्कृतात जास्त वापरलं जातं. एकंदरित सांगायचं झालं तर ‘श’ उच्चारताना जीभ टाळूच्या पुढच्या भागाला लागते तर ‘ष’ उच्चारताना जीभ टाळूच्या मागच्या बाजूला लागते. त्यामुळेच ‘ष’ आणि ‘श’ यांच्यात खूप जास्त फरक आहे. मग आहे की नाही मायमातीच्या भाषेची गंमत.
मराठी भाषा बोलताना तिचा अभ्यास तिचा इतिहास आणि त्या भाषेची गंमत कळली की ती समजण्यास देखील सोपी वाटते. हे आधीच संत ज्ञानेश्वरांनी हेरलं होतं. ज्या काळात संस्कृत शिकणं विशिष्ट समाजाच्य़ा लोकांचा हक्क समजला जायचा तिथे लोककल्याणासाठी ज्ञानोबारायांनी मराठी भाषेतून जीवनाचं सार सांगितलं. तुम्हा आम्हा सारख्या माणसांना कळावं यासाठी त्यांनी मराठीतून साहित्य लिहिलं. या मराठीचं कौतुक करताना ज्ञानोबाराया म्हणतात की, “माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके” . ज्ञानेश्वरी, अध्याय ६ मधील ही ओळ असून मराठी भाषेचा गोडवा आणि सामर्थ्य सांगणारी आहे. याचा अर्थ असा की, “माझी मराठी भाषा कौतुकाने बोलली जाणारी आहे, ती अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे” असं वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलं.