Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1971 मध्ये 15 दिवस हिरव्या कापडाने झाकलेला होता ताजमहाल; वाचा यामागील रंजक कारण

Taj Mahal green cloth 1971 : देशाच्या उत्तरेकडील सीमांवर युद्धसदृश तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ७ मे रोजी संपूर्ण देशात मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 08, 2025 | 01:01 PM
Taj Mahal was covered in green cloth for 15 days in 1971

Taj Mahal was covered in green cloth for 15 days in 1971

Follow Us
Close
Follow Us:

Taj Mahal green cloth 1971 : देशाच्या उत्तरेकडील सीमांवर युद्धसदृश तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ७ मे रोजी संपूर्ण देशात मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या मॉक ड्रिलचा उद्देश म्हणजे सामान्य नागरिकांना युद्धकालीन परिस्थितीमध्ये स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक देणे. विशेष बाब म्हणजे, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी ताजमहाल तब्बल १५ दिवस हिरव्या कापडाने झाकण्यात आला होता, अशी ऐतिहासिक आठवण यानिमित्ताने पुन्हा उजळून निघाली आहे.

१९७१ मधील इतिहास, ताजमहालचे संरक्षण प्रथम

१९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या युद्धात पाकिस्तानकडून हवेतून मोठ्या हल्ल्याची शक्यता होती. अशा वेळी भारत सरकारने आग्र्यातील जागतिक वारसा असलेल्या ताजमहालसारख्या महत्त्वाच्या स्थळांचे संरक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. ताजमहाल ही पांढऱ्या संगमरवरी भव्य इमारत अंतरावरूनही स्पष्ट दिसते, त्यामुळे ती शत्रूच्या हल्ल्याचे संभाव्य लक्ष्य ठरू शकत होती.

ताजमहाल १५ दिवस हिरव्या ज्यूट कापडाने झाकण्यात आला होता, त्याभोवती झुडुपे, फांद्या आणि नैसर्गिक अडथळे तयार करण्यात आले होते. या कालावधीत पर्यटकांना ताजमहालमध्ये प्रवेश दिला गेला नव्हता. हा उपाय यशस्वी ठरला होता आणि या ऐतिहासिक स्मारकाचे पूर्ण संरक्षण करण्यात सरकार यशस्वी झाले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आम्ही एकही क्षेपणास्त्र रोखू शकलो नाही…’ पाकिस्तानी तरुणाचा स्वतःच्याच सैन्यावर हल्लाबोल, VIDEO VIRAL

ऑपरेशन सिंदूरनंतर पुन्हा तणाव वाढला

भारत सरकारने ६-७ मे च्या रात्री पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले, ज्याचे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असे देण्यात आले आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानकडून तीव्र प्रतिक्रिया आली असून पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी याला “युद्धाची कृती” असे संबोधले आहे. परिणामी, भारत-पाकिस्तान सीमांवर तणाव पुन्हा वाढला आहे.

या परिस्थितीत सामान्य नागरिकांची सुरक्षितता, तसेच देशातील आर्थिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. ७ मे रोजी आयोजित केलेल्या मॉक ड्रिलमध्ये नागरी संरक्षण यंत्रणा, पोलीस, आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय सहभाग घेणार आहेत. नागरिकांना एअर अलर्ट मिळाल्यानंतर काय करावे, कुठे लपावे, मदत कशी मागावी, याचे प्रात्यक्षिक दिले जाईल.

ताजमहालवर पुन्हा झाकण टाकले जाईल का?

सध्या तरी उत्तर प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारकडून ताजमहाल झाकण्यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, जर सीमेवरील परिस्थिती आणखी बिघडली आणि हवाई हल्ल्यांचा धोका वाढला, तर १९७१ प्रमाणेच ताजमहालला संरक्षण देण्यासाठी पुन्हा झाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो, तेव्हा ऐतिहासिक वारसा संरक्षित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. मॉक ड्रिलमधून याच गोष्टींचा सराव केला जात आहे – देशाची सुरक्षा आणि नागरिकांचे प्रबोधन.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मोठी बातमी! लाहोरमध्ये साखळी स्फोटांनी पाकिस्तान पुन्हा हादरला, क्षेपणास्त्र हल्ल्याचा संशय

 इतिहास पुन्हा जिवंत होतोय

१९७१ मधील युद्ध, ताजमहालचे संरक्षण, आणि आज पुन्हा उद्भवलेली परिस्थिती हे सर्व इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सरकार सज्ज आहे, यंत्रणा सतर्क आहेत, आणि नागरिकांनाही सजग राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जर देश पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर आला, तर ताजमहालसारख्या अमूल्य वास्तूचे संरक्षण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून आपल्या वारशाचे जतन करण्याची राष्ट्रीय कर्तव्य भावना आहे.

Web Title: Taj mahal was covered in green cloth for 15 days in 1971

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • Indian government
  • Mock Drill
  • Taj Mahal

संबंधित बातम्या

भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज
1

भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.