Pakistan army attack video : भारतीय लष्कराने अलीकडेच राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांचा विध्वंस केल्यानंतर संपूर्ण पाकिस्तान हादरून गेला आहे. भारतीय क्षेपणास्त्रांनी लक्ष्य अचूक साध्य केल्याचे वास्तव पाकिस्तानी नागरिक सोशल मीडियावर उघडपणे मान्य करत आहेत. या प्रचंड आघातानंतरही पाकिस्तान सरकार आणि लष्कर अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असून, एकामागून एक खोटे दावे करत आहे. मात्र, त्यांच्या देशातीलच नागरिक आता सत्य समोर आणत आहेत.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी युवक संतापून आपल्याच लष्करावर सडकून टीका करताना दिसतो. तो स्पष्टपणे सांगतो की, भारताने २५ क्षेपणास्त्रे डागली आणि ती सर्वच्या सर्व आपल्याला रोखता आली नाहीत, ही गोष्ट पाकिस्तानसाठी अत्यंत लाजीरवाणी आहे. या तरुणाच्या म्हणण्यानुसार, भारतीय लष्कराने आपल्या उद्दिष्टांवर अचूक प्रहार केला असून, पाकिस्तानची संरक्षण व्यवस्था पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे.
“भारताने घरात घुसून हल्ला केला” – पाकिस्तानी जनतेचा स्वीकार
हा व्हिडिओ सध्या ट्विटर, यूट्यूब आणि फेसबुकवर जोरात शेअर केला जात आहे. त्या व्यक्तीने म्हटले की, “कोणीही हे म्हणू नये की मी भारताची प्रशंसा करतोय, मी फक्त सत्य सांगतो आहे.” त्याच्या बोलण्यातून तीव्र नाराजी आणि विवशता दिसून येते. पाकिस्तान सरकारकडून देण्यात येणाऱ्या बनावट प्रतिक्रियांना फाटा देत पाकिस्तानी नागरिकच सत्य मांडू लागले आहेत, ही स्थिती पाकिस्तानसाठी आणखी चिंताजनक ठरते आहे. भारत सरकारने या हल्ल्यानंतर अधिकृतपणे सांगितले होते की, “सर्व वैमानिक सुरक्षितपणे परतले आहेत” आणि ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाले आहे. आता पाकिस्तानी जनतेच्या प्रतिक्रिया पाहता, भारतीय लष्कराच्या रणनीतीची प्रभावीता स्पष्टपणे दिसून येते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मोठी बातमी! लाहोरमध्ये साखळी स्फोटांनी पाकिस्तान पुन्हा हादरला, क्षेपणास्त्र हल्ल्याचा संशय
पहलगाम हल्ल्याचा कडक प्रत्युत्तर
ऑपरेशन सिंदूर ही कारवाई पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आली होती. त्या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला होता. भारताने जाहीरपणे म्हटले होते की “आम्ही त्यांच्या घरात घुसून हल्ला करू”, आणि भारताने ते वचन पाळले. भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईमुळे पाकिस्तानची सत्ताधारी यंत्रणा, लष्कर आणि आयएसआयवर जगभरातून प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत. पाकिस्तानने भारतावर प्रत्युत्तर दिल्याचे ढोंग केल्याचा प्रयत्न केला, पण कोणताही पुरावा न देता केवळ प्रोपगंडा चालवण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला.
Pakistani Citizen questions Inefficiency and Weakness of the Pakistan Army.
“India me Wakay Ghar Mein Guske Maara hai”
“Agar India ne GHQ pe yehi missile daage hote, toh abhi tak programme ban chuka hota”
“Ek bhi Missile Hum Nahi Rok Sake”.
Calls out Fake News by Pak Media. pic.twitter.com/Z1ZIzZssYp
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 8, 2025
credit : social media
जगभरात पाकिस्तानची नामुष्की
या हल्ल्यामुळे पाकिस्तानची सर्वसामान्य नागरिकांमध्ये लाजीरवाणी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या सरकारकडून माहिती दडपली जात आहे, तर भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट, प्रभावी आणि पुराव्यांवर आधारित माहिती देण्यात येत आहे. परिणामी, पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हा तोच देश आहे जिथे लादेन… ‘, Operation Sindoor चा ब्रिटिश संसदेत बोलबाला, भारताचा पाकविरुद्ध मोठा संदेश
पाकिस्तानची भीती आणि भारताची निर्णायक कारवाई
‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर आणि निर्णायक भूमिका घेतली आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. भारतीय लष्कराची सर्जिकल स्ट्राइक क्षमताही पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पाकिस्तानमधील सामान्य जनता देखील आता आपल्या सरकारच्या अपयशाला बळी न पडता सत्य बोलण्यास पुढे सरसावलेली दिसते आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसाठी हा हल्ला केवळ लष्करी नव्हे, तर मानसिक आणि सामरिक धक्का ठरला आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, दहशतवादाला कधीही आणि कुठेही प्रत्युत्तर दिले जाईल – तेही घरात घुसून!