World Suicide Prevention Day: तुटण्यापेक्षा बोललेले बरे! आत्महत्येचे विचार रोखण्यासाठी ठरतील प्रभावी 'हे' ३ सोपे मार्ग ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि धावपळीच्या युगात मानवी आयुष्य अत्यंत गुंतागुंतीचे बनले आहे. कौटुंबिक तणाव, आर्थिक अडचणी, शैक्षणिक दडपण, अयशस्वी नातेसंबंध किंवा मानसिक आजार यांमुळे अनेक व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत ढकलल्या जातात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला समस्येतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा ती टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार करू लागते. मात्र, प्रत्येक जीव मौल्यवान आहे आणि कोणत्याही कठीण प्रसंगावर उपाय शक्य आहे, हाच आशेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर रोजी ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ (World Suicide Prevention Day) पाळला जातो.
हा विशेष दिवस जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध संघटना (IASP) यांच्या संयुक्त विद्यमाने २००३ सालापासून साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवसाचा मुख्य उद्देश आत्महत्येशी जोडलेला सामाजिक कलंक (Stigma) दूर करणे, मानसिक आरोग्याविषयी उघडपणे बोलण्यास लोकांना प्रोत्साहित करणे आणि गरजूंना वेळेत वैद्यकीय व भावनिक मदत मिळवून देणे हा आहे.
वर्ष २०२४ ते २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने “आत्महत्येबद्दलचा दृष्टिकोन बदला” (Changing the Narrative on Suicide) ही संकल्पना निश्चित केली आहे. या मोहिमेचा मुख्य मुख्यमंत्र म्हणजेच “संवादाला सुरुवात करा” (Start the Conversation). पूर्वीच्या काळी मानसोपचार किंवा मानसिक तणावाबद्दल बोलणे हे लज्जास्पद मानले जात असे. परंतु, आता ही शांतता भंग करून नैराश्याशी झुंजणाऱ्या व्यक्तींशी सहानुभूतीने बोलणे काळाची गरज बनले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Greece : करोडोंचे मालक ब्रिटन सोडून ग्रीसमध्ये का जात आहेत? जाणून घ्या कर सवलत अन् लक्झरी जीवनशैलीचे मुख्य रहस्य
तज्ज्ञांच्या मते, कोणतीही व्यक्ती अचानक आत्महत्या करत नाही; त्यापूर्वी ती आपल्या वागण्यातून, शब्दांतून किंवा हावभावांतून काही संकेत (Warning Signs) देत असते. उदा. अचानक शांत होणे, कोणामध्येही न मिसळणे, नेहमी निराश बोलणे किंवा जीवनाचा कंटाळा आल्याचे सांगणे. अशा वेळी जर आपण त्या व्यक्तीचे म्हणणे कोणतेही पूर्वग्रह न ठेवता (Without Judgement) शांतपणे ऐकून घेतले, तर तिच्या मनातील नकारात्मकतेचे ढग विरघळण्यास मदत होते.
आत्महत्या रोखण्याची पहिली पायरी म्हणजे संवेदनशीलता आणि आपुलकी. जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक वेदनेतून जात असते, तेव्हा तिला उपदेशांपेक्षा एका सुरक्षित आधाराची आणि ऐकून घेणाऱ्या कानाची गरज असते. समाजात प्रत्येक स्तरावर शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस आणि कुटुंबांमध्ये मानसिक आरोग्यावर मोकळेपणाने चर्चा होणे आवश्यक आहे.
१० सप्टेंबर रोजी जगभरात विविध सरकारी व बिगर-सरकारी संस्थांद्वारे कार्यशाळा, मोफत समुपदेशन शिबिरे, वेबिनार आणि जनजागृती रॅलींचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांतून लोकांना तणाव व्यवस्थापन (Stress Management), डिप्रेशनवर मात करण्याचे उपाय आणि हेल्पलाइन क्रमांकांची माहिती दिली जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Putin In India: राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दिल्ली दौरा; रशिया भारतात आणणार नव्या पिढीची जेट इंजिने, Su-57 लढाऊ विमानांच्या करारावर
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही व्यक्ती तीव्र नैराश्य, मानसिक दडपण किंवा आत्महत्येच्या विचारांशी झुंजत असेल, तर अजिबात घाबरू नका. तात्काळ खालील मोफत आणि विश्वासू हेल्पलाइन क्रमांकांशी संपर्क साधा:
लक्षात ठेवा, कोणतीही समस्या आयुष्यापेक्षा मोठी असू शकत नाही. योग्य वेळी घेतलेली मदत आणि दाखवलेली आपुलकी एखाद्याचे प्राण वाचवू शकते. या जागतिक दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊन मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची आणि एकमेकांना सावरून धरण्याची शपथ घेऊया!






