Asia Cup 2025: Indian team towards a new 'auspicious' mind; Mr 360's captaincy temporary? BCCI warns
Asia cup 2025 : पुढील महिन्यातील ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या निवडसमितीने मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघांची शुरा सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. तर शुभमन गिलकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. त्याच वेळी, टीम इंडिया १० सप्टेंबरपासून या आशियाकपमधील आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे. बीसीसीआयकडून करण्यात आलेली भारतीय संघाची निवड अनेकांच्या भुवया उंचवणारी ठरली. अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. काहींच्या मते श्रेयस अय्यरला संघात स्थान न दिल्याने त्याच्यावर अन्याय झाला आहे.
निवडबाबत लोकांनी व्यक्त केलेले आश्चर्य हे सूर्यकुमार यादवसाठी नसून शुभमन गिलच्या निवडीसाठी होते. शुभमन गिलने बऱ्याच काळानंतर टी-२० संघात धमाकेदार पुनरागमन केले आहे. एटकेच नाही तर त्याला संघाचा तीही उपकर्णधार देखील बनवण्यात आले आहे.
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सध्या शुभमन गिल हा कसोटीचा भरतीय संघाचा कर्णधार आहे. आता गिलला टी-२० मध्ये उपकर्णधार बनवणे यह एक इशारा मनाला जाता आहे. बीसीसीआय त्याच्यामध्ये तिन्ही फॉरमॅटसाठी कर्णधारपद बघत आहे. आता २०२७ मध्ये खेळवण्यात येणाऱ्याएकदिवसीय विश्वचषकात गिललाही कर्णधारपद सोपवण्यात येण्याची चिन्हे आहेत. त्याच वेळी, तो काही काळानंतर टी-२० चा कर्णधार देखील बनू शकतो.
सूर्यकुमार यादव २०२५ च्या आशिया कपमध्ये टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारतील. सध्या सूर्यकुमार यादव ३४ वर्षांचे आहेत. २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी अजून एक वर्ष शिल्लक आहे. त्यानंतर तो ३५ वर्षांचा होईल. त्यानंतर एक-दोन वर्षांनी तो या फॉरमॅटला अलविदा म्हणण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआय लवकरच टी-२० साठी नवीन कर्णधार शोधत आहे. त्याच वेळी, २०२५ च्या आशिया कपमध्ये शुभमन गिलला उपकर्णधार बनवणे हे बोर्ड गिलला या फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवू इच्छित असल्याचे संकेत देते.
सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२५ गाजवली आहे. आयपीएलमध्ये त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याच वेळी, आयपीएल २०२४ मधील त्याची कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती. टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीबाबत सांगायचं झालं तर सूर्यकुमार यादवने चांगली कामगिरी केली आहे. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अंदाज आहे की सूर्यकुमार यादव संघासोबत अजस्ट कल राहु शकत नाही. म्हणूनच तो शुभमन गिलच्या रूपात त्याचा भविष्यातील आराखडा तयार करण्याच्या विचारात आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’ शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी..
इंग्लंड दौऱ्यात पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत शुभमन गिलने नेतृत्वासोबतच फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. या दरम्यान, भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले आहेत. त्याकया या कामगिरीचा विचार करता बीसीसीआयने त्याचा भविष्यात तिन्ही स्वरूपात कर्णधार म्हणून विचार कर्ता आहे.