
फोटो सौजन्य - JioHotstar
सामना गमावल्यानंतर सूर्यकुमार यादवचे विधान : भारत दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सलग चार विजयांनंतर, टीम इंडियाला २०२६ च्या विश्वचषकातील पहिला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर, भारताच्या संघाचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत.
या पराभवानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्याबद्दल आणि त्याच्या उणीवांबद्दल चर्चा केली. या सामन्यात भारतीय फलंदाज खूपच निराश झाले. पराभवानंतर सूर्यकुमार यादवने एक महत्त्वाचे विधान केले. सामन्यानंतर तो म्हणाला, “आम्ही सुरुवातीला खेळात टिकून राहिलो. सुरुवातीला आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांनी ७ ते १५ षटकांपर्यंत खूप चांगली फलंदाजी केली आणि नंतर आम्ही पुनरागमन केले. गोलंदाजी चांगली होती, पण फलंदाजी आणखी चांगली होऊ शकली असती”.
पुठे त्याने सांगितले की, “ कधीकधी तुम्हाला विचार करावा लागतो की पॉवरप्लेमध्ये तुम्ही सामना जिंकू शकत नाही, पण तुम्ही हरू शकता. आम्हाला आवश्यक असलेल्या भागीदारी आम्ही करू शकलो नाही. हा खेळाचा एक भाग आहे. आम्ही यातून शिकू. आम्ही सावधगिरीने खेळू आणि पुनरागमन करू.” सूर्याने आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा पराभव खराब फलंदाजीमुळे झाला. या पराभवामुळे भारताचा सेमीफायनलचा मार्ग कठीण झाला आहे. भारताला आता पुढील दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील.
Suryakumar Yadav said “We will comeback strong”. pic.twitter.com/e4lETeTsef — Johns. (@CricCrazyJohns) February 22, 2026
प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ७ बाद १८७ धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडिया १८.५ षटकांत १११ धावांवरच रोखली गेली. भारताच्या एकाही प्रमुख फलंदाजाला लक्षणीय खेळी करता आली नाही. इशान किशन ०, अभिषेक शर्मा १५, तिलक वर्मा १ आणि सूर्यकुमार यादव १८ धावांवर बाद झाले. शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या, त्यांनी ३७ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले.
भारताच्या आगामी दोन सामन्यामध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे त्याचबरोबर चांगला रन रेट असणे देखील गरजेचे असणार आहे. तर भारताच्या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करता येणार आहे.