Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 Final : टीम इंडियाचे खेळाडू मालामाल! बीसीसीआयकडून २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव; वाचा सविस्तर 

आशिया कप स्पर्धे आधी भारताने २०२४ टी२० विश्वचषक, २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकले होते. या तीन स्पर्धांमध्ये भारताने जेतेपद जिंकल्याने बीसीसीआयकडून आतापर्यंत संघाला २०४ कोटींचे बक्षीस देण्यात आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 29, 2025 | 09:18 PM
Asia Cup 2025 Final: Team India players are rich! BCCI showers Rs 204 crore in prizes; Read in detail

Asia Cup 2025 Final: Team India players are rich! BCCI showers Rs 204 crore in prizes; Read in detail

Follow Us
Follow Us:

IND vs PAK Final : भारतीय संघाने आशिया कप २०२५(Asia Cup 2025) स्पर्धेत शानदार कांगिरीचे प्रदर्शन केले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत भारताने विजेतेपद जिंकले आहे. या सामन्यात ४ विकेट्स घेणारा कुलदीप यादव, ६९ धावा करणारा तिलक वर्मा या विजयाचे हीरो ठरले आहेत. भारतीय संघाने गेल्या काही काळात शानदार कामगिरी केली आहे.  सलग तीन बहु-संघीय स्पर्धा जिंकून भारतीय क्रिकेट संघाने कक्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. टीम इंडियाने गेल्या १५ महिन्यांत तीन प्रमुख स्पर्धा आपल्या नावावर केल्या आहेत. २०२४ टी२० विश्वचषक, २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२५ आशिया कपचे जेतेपद मिळवले आहे. टीम इंडियाने हे सर्व स्पर्धा एकतर्फी विजयाने जिंकले आहेत आणि बीसीसीआयने खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : IND vs PAK Final : कोच गौतम गंभीरची इतिहासाला गवसणी! ‘ही’ कामगिरी करणारा तो जगातील ठरला पहिलाच खेळाडू…

एशिया कप विजेत्या खेळाडूंवर होणार बक्षिसांचा वर्षाव

आशिया कप २०२५ चे विजेतेपद भारतीय संघासाठी विशेष आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ५ गडी राखून धुव्वा उडवला आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर आणि ७ मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांच्या क्रिकेट संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. सर्वांच्या नजरा आशिया कपवर खिळून होत्या. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ३ वेळ पराभव केला आहे. बीसीसीआयने या उल्लेखनीय विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बीसीसीआयकडून संघासाठी  २१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

यापूर्वी, ९ मार्च २०२५ रोजी टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. हा भारतीय संघाचा तिसरा विजय होता. या विजयानंतर, बोर्डाकडून २० मार्च रोजी खेळाडू आणि प्रशिक्षकांसह संघातील सर्व सदस्यांसाठी ५८ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, भारतीय संघाने सर्वच सामने जिंकले होते आणि परिणामी भारताने विजेतेपद आपल्या नावावर केले.

हेही वाचा : IND vs PAK Final : पाकिस्तानला दाखवला खरा चेहरा! भारताचा केला जयजयकार; ‘ती’ परदेशी मुलगी कोण? पहा VIDEO

टी२० विश्वचषकासाठी १२५ कोटी रुपये

आशिया कप २०२५ पूर्वी, भारतीय संघाने जून २०२४ मध्ये टी२० विश्वचषकाचे जेतेपद जिंकले. विजेतेपदाच्या सामन्यात, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना त्यांना ७ धावांनी पराभूत धूळ चारली होती १७ वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर पुन्हा ट्रॉफी आपल्याकडे परत मिळवली. त्यानंतर बीसीसीआयकडून टीम इंडियासाठी १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली होती.  याचा सरल अर्थ असा की, या तीन स्पर्धा जिंकल्याबद्दल भारतीय संघावर आतापर्यंत एकूण २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे.

Web Title: Asia cup 2025 final team india players get rs 204 crore reward from bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 09:18 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • bcci
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या चाहत्यांना धक्का! मुंबईला कायमचा ठोकला राम-राम, ‘या’ मोठ्या कारणाने सोडली मुंबई
1

Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या चाहत्यांना धक्का! मुंबईला कायमचा ठोकला राम-राम, ‘या’ मोठ्या कारणाने सोडली मुंबई

Asian Games 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; हरमनप्रीत कौर करणार नेतृत्व, ‘या’ नव्या खेळाडूला संधी
2

Asian Games 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; हरमनप्रीत कौर करणार नेतृत्व, ‘या’ नव्या खेळाडूला संधी

IND vs PAK: FIH Pro league मध्ये भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; ७-१ ने ऐतिहासिक विजय
3

IND vs PAK: FIH Pro league मध्ये भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; ७-१ ने ऐतिहासिक विजय

चाहत्यांच्या भावनांचा अपमान? पहिल्या सामन्यात Vaibhav Sooryvanshi ला संघात स्थान नाही, कारण काय?
4

चाहत्यांच्या भावनांचा अपमान? पहिल्या सामन्यात Vaibhav Sooryvanshi ला संघात स्थान नाही, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.