
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
एका मुलाखतीदरम्यान अक्षर पटेलला या नियमाबद्दल विचारण्यात आलं असता त्याने स्पष्ट केलं की, “खरं सांगायचं तर, मला हा नियम अजिबात आवडलेला नाही. मी एक All-rounder खेळाडू आहे. पूर्वी संघ फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर मदत करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची निवड करायचे. पण आता या नियमामुळे संघ व्यवस्थापन फक्त तज्ज्ञ फलंदाज किंवा तज्ज्ञ गोलंदाजाची निवड करते. अष्टपैलू खेळाडूची गरजच काय? असा विचार आता केला जातोय.” अक्षरने पुढे स्पष्ट केले की, जरी वैयक्तिक स्तरावर त्याला हा नियम आवडत नसला तरी, BCCI चे नियम पाळणे खेळाडू म्हणून त्यांचे कर्तव्य आहे.
केवळ अक्षर पटेलच नाही, तर भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही यापूर्वी या नियमावर सडकून टीका केली आहे. रोहितच्या मते, या नियमामुळे शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर सारख्या अष्टपैलू खेळाडूंना गोलंदाजीची संधी मिळत नाहीये, जे भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी चांगले नाही.विराटने म्हटले होते की, या नियमामुळे खेळाचा समतोल बिघडला आहे. फलंदाज आता निडर होऊन खेळतात कारण त्यांच्याकडे ८ व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी उपलब्ध असते, ज्यामुळे गोलंदाजांवरील दडपण वाढले आहे.
२००५-०६ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असाच ‘सुपर-सब’ नियम आणला होता, पण तो अयशस्वी ठरल्याने एका वर्षातच हटवण्यात आला. बिग बॅश लीगमध्ये हा नियम वापरण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाच्या या लीगमध्ये ‘एक्स-फॅक्टर’ नियम आणला होता, तो देखील यशस्वी झाला नाही. जगभरातून विरोध होत असूनही, आयपीएलमध्ये सलग चौथ्या हंगामात हा नियम कायम राहणार आहे.
२०२३ मध्ये बीसीसीआयने हा नियम आणला. यानुसार, सामन्याच्या कोणत्याही परिस्थितीत संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमधील एका खेळाडूला बाहेर काढून त्याच्या जागी राखीव खेळाडूला मैदानात उतरवू शकतो. यामुळे संघांकडे आता ‘११’ ऐवजी ‘१२’ खेळाडूंचे बळ असते.