2027 मध्ये होणार एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धा (ai gemini)
2027 च्या अखेर एकदिवसीय वर्ल्ड कप होण्याची शक्यता
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार स्पर्धा
एकूण 14 संघ खेळणार वर्ल्ड कप
ICC World Cup 2027: नुकतीच टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा पार पडली आहे. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे. आता सर्व क्रिकेट चाहत्यांना 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेची आतुरता लागली आहे. मात्र त्याबाबत काही महत्वाची बातमी समोर येत आहे.
2027 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपची उत्सुकता आतापासूनच वाढत चालली आहे. कुठे होणार, कधी होणार, कोणते संघ खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या समोर असलेल्या समीकरणानुसार दोन वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला 2027 मध्ये खेळायला मिळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.
चार वर्षांमधून एका एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले जाते. 2027 कहा वर्ल्ड कप हा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवला जाणार आहे. 2027 मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होऊ शकते. एकूण 14 संघ ही स्पर्धा खेळण्याचा अंदाज आहे. अद्याप पूर्ण शेड्यूल समोर आलेले नाही.
IPL 2026 मधील ‘त्या’ नियमाचा ऑलराउंडर्सना फटका?, Axar Patel भडकला
कसे असणार समीकरण?
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे या ठिकाणी वर्ल्ड कप होणार असल्याने या संघांनी क्वालिफाय केले आहे. तर नामिबियाला क्वालिफाय करावे लागणार आहे. बाकी संघाची निवड त्यांच्या आयसीसी रॅंकिंगवरुन केली जाणार आहे. जे पहिले 8 संघ असतील त्यांना थेट वर्ल्ड कप खेळता येणार आहे.
सध्या आयसीसी रॅंकिंग पाहिल्यास वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशचे संघ टॉप 8 च्या बाहेर आहेत. वेस्ट इंडिजच्या संघाने आपल्या कमगिरीत सुधारणा न केल्यास त्यांना वर्ल्ड कप खेळता येण्याची शक्यता कमी आहे. तसेच बांग्लादेशला देखील आपली कामगिरी सुधारायला लागणार आहे.
‘त्या’ नियमाचा ऑलराउंडर्सना फटका?
IPL हंगामात नेहमची वेगवेगळे वाद चर्चेत राहिलेले असतात. आताचा २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी क्रिकेट जगतात पुन्हा एकदा एका जुन्या वादाने आपलं तोंड वर काढले आहे. तो वाद म्हणजे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने या नियमावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने थेट या मुद्द्यावर वक्तव्य करत अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असल्याचे विधान केलं आहे. नेमकं काय प्रकरण?






