
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघात कर्णधारपदावरून वाद सुरू आहे. तो काही थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीये. सध्या पाकिस्तान वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून, टेस्ट सिरिज खेळत आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा बाबर आझमकडे सोपवण्यात आले आहे. मात्र, बाबरने हे कर्णधारपद सहजासहजी स्वीकारलेले नाही. कर्णधार बनण्यापूर्वी बाबरने पीसीबीसमोर एक मोठी अट ठेवल्याचे समोर आल्याने पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
शान मसूदच्या खराब कामगिरीमुळे पीसीबीने बाबर आजमला वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. त्यावेळेस बाबर आजमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर आपल्या काही मागण्या ठेवल्या आहेत.
PAK Vs WI: लढाई अस्तित्वाची! वेस्ट इंडिज अन् पाकिस्तान आमनेसामने; WTC मध्ये उलथापालथ…
काय आहेत मागण्या?
पाकिस्तान कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवताना बाबर आजमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डायसामोर काही मागण्या ठेवल्या आहेत. मला केवळ एकाच फॉर्मटचे नव्हे तर तीनही म्हणजेच कसोटी, वनडे आणि टी 20 संघाचे कर्णधारपद हवे आहे. जर बोर्ड मला तिन्ही फॉरमॅटमध्ये पूर्ण नेतृत्व देणार असेल, तरच मी कसोटीची कमान हाती घेईन, अशी मागणी बाबर ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर ठेवल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच…
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आजमची मागणी मान्य केली तर वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला मोठा झटका बसू शकतो. शाहीन सध्या पाकिस्तानच्या वनडे/टी-२० संघाचा कर्णधार आहे. यापूर्वी टी-२० फॉरमॅटमधून त्याला हटवून पुन्हा बाबरकडे कर्णधारपद सोपवल्यावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. आता जर बाबरने तिन्ही फॉरमॅटचे नेतृत्व मिळवले, तर शाहीनकडून वनडेचे कर्णधारपदही हिसकावून घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.