Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : ‘BCCI सरकारच्या निर्णयाशी…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, फलंदाजी प्रशिक्षकाने केला मोठा दावा 

आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. याबाबत आता भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली. ते म्हणाले की, आमचे लक्ष सामन्यावर आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 13, 2025 | 02:35 PM
Asia Cup 2025: 'BCCI is against the government's decision...', before the India-Pakistan match, the batting coach made a big claim

Asia Cup 2025: 'BCCI is against the government's decision...', before the India-Pakistan match, the batting coach made a big claim

Follow Us
Close
Follow Us:
  •  आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना 
  • भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशूच्या मते यांचे लक्ष्य सामन्यावर 
  • भारत-पाकिस्तान सामन्याबाबत सरकारच्या निर्णयाशी बीसीसीआय सहमत 
IND VS PAK : आशिया कपमध्ये आतापर्यंत चार सामने खेळून झाले आहेत. आज श्रीलंका आणि  बांगलादेश आमनेसामने असणार आहे तर १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. या स्पर्धेत भारताने यूएईला तर पाकिस्तानने ओमानला पराभूत करत विजयी सुरुवात केली आहे. आता हे दोन संघ १४ सप्टेंबर रोजी समोरासमोर येणार आहेत. या सामन्यापूर्वी, भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमचे लक्ष सामन्यावर आहे.

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक असणारे  सितांशू कोटक यांनी सांगितले की, जेव्हापासून बीसीसीआयने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. तेव्हापासून संघाकडून आता लक्ष पूर्णपणे क्रिकेटवर केंद्रित करण्यात आले आहे. मे महिन्यात सीमेवर वाढलेल्या तणावानंतर हा भारत-पाकिस्तान यांच्यातील हा पहिलाच सामना असणार आहे.

हेही वाचा : Asia Cup Points Table : आशिया कपच्या गुणतालिकेच उलथापालथ! संघाच्या रॅंकिंगमध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या

सितांशू कोटक नेमकं काय म्हणाले?

आयसीसी अकादमी मैदानावर भारताच्या सराव सत्र सुरू होते त्यानंतर कोटक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तेव्हा त्यांनी सांगितले की, जेव्हापासून बीसीसीआयकडून सरकारच्या निर्णयाशी सहमती दर्शवत असल्याचे सांगण्यात आले, तेव्हापासून आमचे लक्ष नेहमीच सामन्यावर राहिले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा एक मनोरंजक सामना असणार आहे. कोटक पुढे म्हणाले की, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात नेहमीच स्पर्धात्मक सामना होत  आला आहे.

काश्मीरमधील पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच्या तणावामुळे क्रिकेटपटू प्रभावित होण्याची शक्यता आहे का?असा प्रश्न विचारल्यावर   कोटक म्हणाले की, “खेळाडू मैदानावर लक्ष केंद्रित करत असून त्यांच्या मनात दुसरे काहीही एक नाही.”

हेही वाचा : Asia Cup 2025 : ओमानने केला पाकिस्तानचा पर्दाफाश! India vs Pakistan सामन्यापूर्वी शेजारी चिंतेत, जाणून घ्या नक्की कारण काय?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध

एप्रिलमध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला.  त्यानंतर आणि भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढला. यामुळे आता  पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याविरुद्ध भारतामध्ये सोशल मीडियावर बराच निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे दिसत आहे.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, मागील  महिन्यातच, भारत सरकारने पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत क्रीडा संबंधांबाबतीत एक धोरण आखण्यात आले. ज्या अंतर्गत भारत कोणत्याही खेळात पाकिस्तानसोबत द्विपक्षीय सामने खेळणार नाही, जरी ते तटस्थ ठिकाणी खेळवण्यात आले तरी देखील नाही. परंतु त्यांना बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळावे लागणार आहे.

Web Title: Bcci agrees with governments decision on india pakistan normalcy asia cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • Salman Ali Agha
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमधील पाचव्या T20I सामन्यावर ‘रद्द’ चे सावट? जाणून घ्या हवामान अहवाल
1

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमधील पाचव्या T20I सामन्यावर ‘रद्द’ चे सावट? जाणून घ्या हवामान अहवाल

IND vs SA 4th T20I : अखेर लखनौ टी-20 सामान्याबद्दल BCCI ने केली चूक मान्य! आगामी मालिकांच्या वेळापत्रकाबाबत काळजी घेणार 
2

IND vs SA 4th T20I : अखेर लखनौ टी-20 सामान्याबद्दल BCCI ने केली चूक मान्य! आगामी मालिकांच्या वेळापत्रकाबाबत काळजी घेणार 

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये भारतच ‘बॉस’! पाचव्या T20 सामन्याचे गणित काय?वाचा सविस्तर
3

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये भारतच ‘बॉस’! पाचव्या T20 सामन्याचे गणित काय?वाचा सविस्तर

IND vs SA 4th T20I : तिकीटासाठी पठ्ठ्याने गव्हाचे 3 पोते विकले! सामना रद्द अन् चाहत्याचा संताप अनावर; Video Viral
4

IND vs SA 4th T20I : तिकीटासाठी पठ्ठ्याने गव्हाचे 3 पोते विकले! सामना रद्द अन् चाहत्याचा संताप अनावर; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.