
Asia cup 2026
मुंबईत पार पडलेल्या बीसीसीआयच्या ९५व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सैकिया यांनी या बाबत प्रतिक्रिया दिली आहे. ACC मुख्यालयात ट्रॉफी ठेवण्याच्या प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, ट्रॉफी सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून तात्पुरत्या स्वरूपात दुबईत ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्या लवकरच भारतात आणली जाणार असल्याचे समजते आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघाने आशिया कप स्पर्धा जिंकली आहे.
#WATCH Mumbai, Maharashtra: BCCI Secretary Devajit Saikia said, "Today we held our 95th Annual General Meeting… Next year marks 100 years of BCCI. We will celebrate the centenary from December 2027 to December 2028. Discussions have been held on this. The 20th edition of IPL is… pic.twitter.com/Y4Qff563Qg — ANI (@ANI) September 18, 2026
आशिया कप स्पर्धेच्या दोन्ही ट्रॉफी एक दिवस नक्की भारतात येतील अशी आमहाला पूर्ण अपेक्षा, आशा आहे. मी तुम्हाला यासंदर्भात कोणतीही निश्चित वेळ किंवा तारीख सांगणार नाही, पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक आश्वासन देतो की, दोन्ही ट्रॉफी शेवटी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर असलेल्या बीसीसीआयच्या मुख्यालयातच येतील.
मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार
महिला आशिया कप २०२६ चा अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय संघ आणि श्रीलंकन संघ यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना जिंकला आणि आशिया कप ट्रॉफीवर ८ व्यांदा आपले नाव कोरले. अंतिम सामन्यानंतर पाकिस्तानसोबतची नो हँडशेक पॉलिसी वाद पुन्हा उफाळला.भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा अपमान केला आहे.आशिया कप २०२६ चा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.