
क्रिकेटपटू शिखर धवनची प्रतिक्रिया
Humare youth humare desh ka future hain. Unke sapnon ko samajhna zaroori hai par saath hi, mushkil waqt mein patience rakhna aur desh ki institutions aur sarkar par bharosa banaye rakhna bhi utna hi zaroori hai. Mera maanna hai ki har challenge ka solution patience se nikalta… — Shikhar Dhawan (@SDhawan25) July 23, 2026
आपली युवा पिढी हेच आपल्या देशाचे भविष्य आहे. त्यांची स्वप्ने आणि भावना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कठीण प्रसंगी विद्यार्थ्यांनी संयम बाळगला पाहिजे. देशातील सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक प्रश्नावर संवाद आणि धैर्याने मार्ग निघू शकतो. भारत नेहमीच प्रगती करत आहे आणि यापुढेही करत राहील.
सचिन तेंडुलकरची प्रतिकीया काय?
माझे वडील प्राध्यापक होते. ते अनेक तरुण विद्यार्थ्यांसाठी एक मेंटॉर आणि मार्गदर्शक होते. त्यांनी मला लहानपणीच एक शिकवण दिली होती ती म्हणजे, ‘अपयश आलं तरी चालेल, पण फसवणूक करणे योग्य नाहीये. कधीही शॉर्टकट घेऊ नये. समाजातील क्ती म्हणून, संस्कृती घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. प्रयत्नांपेक्षा केवळ निकालांना (यश/अपयशाला) प्राधान्य देणारा समाज गुणवत्तेपेक्षा नेहमी शॉर्टकटचा शोध घेतो. आज, विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होत नाहीये आणि त्यांना निराशा येत आहे.
pic.twitter.com/3a8WRHhWIK — Sachin Tendulkar (@sachin_rt) July 23, 2026
तेव्हा त्यांची ही भावना समजण्यासारखी आहे. यापुढे त्यांना कधीही असा निराश होण्याचा प्रसंग येणार नाही, यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे.’युवा भारत’ स्वप्नांनी आणि ऊर्जेने परिपूर्ण आहे. ते आपल्या यशाचे इन्धन आहेत. समाज म्हणून पालक, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शाळा आणि प्रशासक या सर्वांची एक मोठी जबाबदारी आहे. आपल्या तरुणांना सतत प्रोत्साहन आणि ऊर्जा मिळत राहावी, यासाठी प्रत्येकाची वेगळी भूमिका आहे. मला खात्री आहे की आपण सर्वजण मिळून असे उपाय शोधू, ज्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य मजबूत होईल आणि त्यांच्या आकांक्षांचे रक्षण होईल.
जय हिंद!
राजधानी दिल्लीचे जंतर-मंतर हे या संपूर्ण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरत आहे. 20 जुलै रोजी संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा यांच्यात झटापट झाल्याचे दिसून आले. याचे काही व्हिडिओ देखील सोशल मिडियावर पाहायला मिळत आहेत.