
भारताने झिम्बाम्ब्वेविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. या सिरिजचा वैभव सूर्यवंशी हीरो ठरला आहे. भारताने ही सिरिज 3-0 ने जिंकली आहे. वैभव सूर्यवंशीने तीनही सामन्यात 151 रन्स केल्या आहेत. यामुळे भारतीय संघ आणि झिम्बाम्ब्वे दौऱ्यासाठी कोच असणारे व्हीव्हीएस लक्ष्मण अत्यंत खुश झाले आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी वैभव सूर्यवंशीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले व्हीव्हीएस लक्ष्मण?
मला वाटते की वैभव सूर्यवंशीने आपल्या फिटनेसवर अजून काम केले पाहिजे. तो अजून लहान आहे, मात्र खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःला यशस्वी प्रयत्न करत असतो. कालच्या सामन्यात तो बाउंड्रीवर डाईव्ह मारत कॅच पकडताना दुखापत झाली तो ग्राऊंडच्या बाहेर जाण्यास इच्छुक नव्हता. यावरून तो संघासाठी सर्वस्व देण्यासाठी तत्पर असतो हे दिसून येतो. मागील सहा महिन्यात त्याने स्वतःवर भरपूर काम केले आहे.
झिम्बाम्ब्वेविरुद्धच्या सिरिजमध्ये वैभवने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. आम्हाला त्याच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा होती. त्याने आयपीएलमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. शेवटच्या सामन्यात शतक न करू शकल्याने वैभव सूर्यवंशी निराशा झाला होता, असे लक्ष्मण यांनी सांगितले. तेव्हा ही तुझी शेवटची संधी नाही, तुझे करियर आत्ताच सुरू झाले आहे, असे वैभवला सांगण्यात आले.
IND vs ZIM 3rd T20 Live: भारताची विजयी हॅट्ट्रिक! झिम्बाब्वेला 35 धावांनी हरवत केला क्लीन स्वीप
वैभव सूर्यवंशी झाला नंबर 1
वैभव सूर्यवंशीने या सिरिजमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. कालच्या सामन्यात त्याने 81 रन्सची शानदार खेळी केली. पहिल्या बॉलपासूनच त्याने आक्रमक फलंदाजी केल्याचे दिसून आले. तीनही सामन्यात वैभव सूर्यावंशीने शानदार फलंदाजी करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. इंग्लंड दौऱ्यात फॉर्ममध्ये असलेली सर्व कमतरता वैभव सूर्यवंशीने या सिरिजमध्ये पूर्णपणे भरून काढली आहे.