
दिल्ली कॅपिटल्स संघ का हरला (फोटो सौजन्य - Instagram)
गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये अगदी शेवटपर्यंत सामना रंगला आणि दिल्लीला केवळ १ धावाने सामना गमवावा लागला. मिलरच्या एका चुकीमुळे दिल्लीला विजयाची हॅटट्रीक साधता आली नाही. एक वेळ अशी होती की, दिल्ली सामना गमावणार हे निश्चित होते मात्र तरीही दिल्लीच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत सामना खेचून आणला होता. मात्र क्रिकेट हा खेळ अनिश्चित असतो आणि कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यानुसारच अगदी शेवटपर्यंत रंगलेल्या या खेळात गुजरात टायटन्सने यश प्राप्त केले. याबाबत प्रेझेंटेशनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कप्तान अक्षर पटेलने आपले स्पष्ट मत मांडले, जाणून घ्या.
DC Vs GT: मिलरने केला दिल्लीचाच ‘गेम’; ‘त्या’ एका चुकीमुळे कॅपिटल्सचा 1 रन्सने दारुण पराभव
संघाच्या पराभवानंतर अक्षर पटेल काय म्हणाला?
दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर अक्षर पटेल म्हणाला की, दोन्ही संघांनी चांगला क्रिकेट खेळला. सामन्यानंतर प्रसारकांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “ज्या पद्धतीने आम्ही खेळत आहोत, मला वाटते की दोन्ही संघांनी खूप चांगला, खूप चांगला क्रिकेट खेळला. मला वाटते की अशा अटीतटीच्या सामन्यात तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बोट दाखवू शकता. त्यामुळे मला वाटते की आम्ही खूप चांगला क्रिकेट खेळलो.”
फलंदाज अधिक हुशारीने खेळू शकले असते
अक्षर पटेल यांचा विश्वास आहे की, जर संघाचे फलंदाज अधिक हुशारीने खेळले असते, तर लक्ष्य आधीच गाठता आले असते. अक्षर म्हणाला की, “मला वाटते की आम्ही लक्ष्याचा पाठलाग करताना अधिक हुशारीने खेळू शकलो असतो. मला वाटते की जर महत्त्वाच्या वेळी विकेट्स पडल्या नसत्या, तर आम्ही लक्ष्याचा पाठलाग खूप आधीच पूर्ण करू शकलो असतो.”
KL राहुलच्या खेळीचे कौतुक
केएल राहुलने ९२ धावा केल्या. त्याच्या फलंदाजीबद्दल अक्षरने यावेळी कौतुक करत म्हटले, “राहुल खूप चांगली खेळी खेळला. तुम्हाला माहीत आहेच की, त्याने पॉवरप्लेनंतरही लय कायम ठेवली. विकेट्स पडत असतानाही, त्याने एका टोकाकडून ती लय कायम ठेवली. त्याने धावगती कमी होऊ दिली नाही. त्यामुळे, मला वाटते की ही खूप चांगली फलंदाजी होती. मला वाटते की आम्ही चांगला क्रिकेट खेळत आहोत आणि पुढच्या सामन्यात आम्ही यात आणखी सुधारणा करू.”
दहशतीखाली फलंदाज! LSG कोचचा मोठा खुलासा, Mohammed Shami ने शोधली धोकादायक बॉलिंग