
आज अक्षर पटेलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाल्यास अक्षर पटेल आपला 100 वा सामना खेळणार आहे. आज तो खेळल्यास त्याचा 100 वा टी 20 क्रिकेट सामना असणार आहे. आतापर्यंत अक्षर पटेल भारतासाठी 99 टी 20 सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 746 रन्स केल्या आहेत. तसेच त्याने टी 20 क्रिकेटमध्ये आपल्या 100 विकेट्स देखील पूर्ण केल्या आहेत.
आज अक्षर पटेल खेळल्यास त्याचा 100 वा सामना असणार आहे. 100 वा टी 20 सामना खेळणारा 5 वा भारतीय खेळाडू होण्याची संधी त्याच्याकडे असणार आहे. तसेच यामध्ये तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला देखील मागे टाकणार आहे. धोनीने भारतासाठी 99 सामने खेळले आहेत. तर या यादीत रोहित शर्मा 161 सामन्यांसाह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर 138 सामन्यांसाह हार्दिक पंड्या आणि तिसऱ्या स्थानावर विराट कोहलीचा समावेश आहे.
गंभीर अन् अय्यर लावणार वाट!
भारतीय संघाला आज विजय हवा असेल तर काही चुका टाळण्याची गरज असणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी असणार आहे. भारतीय संघाने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबाबत जाणून घेऊयात. भारतीय संघात फलंदाजीत सातत्याने बदल केले जात आहेत.
1. भारतीय फलंदाजीत सातत्याने केले जाणारे बदल भारतीय संघाला भोगावे लागत आहेत. पहिल्या क्रमाकांपासून फलंदाजीत बदल करण्यात येत आहेत. मागील सामन्यात तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्या आधी अक्षर पटेल आणि हर्षित राणा यांना वरच्या क्रमाकांवर खेळण्यास पाठविल्याने भारतीय संघाला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.
2. भारतीय गोलंदाज देखील इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरले आहेत. इंग्लंडचे गोलंदाज त्यांच्या खेळपट्टीवरील पीचचा फायदा घेत आहेत. मात्र दुसरीकडे भारतीय गोलंदाज तीच फायदा घेऊ शकत नाहीयेत.
3. भारतीय संघाला तिसरी समस्या मिडल ऑर्डरमध्ये सतावत आहेत. श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, अक्षर पटेल आणि ईशान किशन पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. टॉप ऑर्डरमध्ये केवळ अभिषेक शर्मा रन्स करताना दिसून येत आहे. वैभव सूर्यवंशी देखील चांगला खेळ करत आहे, मात्र त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता न आल्याचे दिसून येत आहेत.