
अद्भुत अन् खळबळजनक! ICC ने लावली आग; T20 वर्ल्डकपमध्ये फॉर्म्युला बदलला, सेमीफायनलच्या आधी...
एडीनबर्ग येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत या नवीन फॉर्मटची घोषणा करण्यात आली आहे. 2028 मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सामील होणार असून एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र त्याच्या आराखड्यात बदल करण्यात आले आहेत.
काय आहेत बदल?
नवीन नियमानुसार आता पहिल्या स्टेजमध्ये 4 ऐवजी 5 ग्रुप्स असणार आहेत. तसेच प्रत्येक ग्रुपमध्ये 4-4 संघ असणार आहेत. आतापर्यंत 5-5 संघाचे चार ग्रुप केले जात असत. प्रत्येक ग्रुपमधील पहिले 2 संघ पुढे जाणार आहेत. 10 संघ सुपर स्टेजमध्ये खेळणार आहेत. त्यांना 5-5 च्या ग्रुपमध्ये विभागले जाणार आहे.
आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली ‘दांडी’; Vaibhav Sooryavanshi चा ‘तो’ व्हिडिओ तूफान Viral
सर्वात मोठा बदल हा नॉक आउट सामन्यांमध्ये करण्यात आला आहे. सुपर 10 मधील पहिले दोन संग थेट सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानवरील संघ एलिमिनेटर खेळणार आहेत. यातील विजेता सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे येत्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलच्या आधी दोन एलिमिनेटर सामने खेळवले जाणार आहेत. 2028 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंड, भारत, साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, बांग्लादेश या संघांनी प्रवेश केला आहे.
आगामी २०२८ च्या टी-२० वर्ल्डकपसाठी क्रिकेट वर्तुळात आतापासूनच मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. १२ संघ निश्चित झाल्यानंतर आता उर्वरित ८ जागांसाठी तब्बल १६ संघांमध्ये पात्रता फेरी खेळवली जाणार आहे. या प्रस्तावाला आगामी आयसीसीच्या बैठकीत अंतिम मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.
आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली ‘दांडी’; Vaibhav Sooryavanshi चा ‘तो’ व्हिडिओ तूफान Viral
झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा
बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरल्याचा त्याला फटका बसला आहे. मात्र भारताचे सलग दोन मालिका गमावून देखील श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.