IND VS AUS: 'Australia tour for Virat-Rohit duo..', India's former head coach predicted; Read in detail
IND VS AUS : नुकतीच भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची मलिका २-० अशी जिंकली आहे. या मालिकेतनंतर भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ ऑक्टोबरपासून भारत तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करणार आहेत. या जोडीबद्दल आता भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भाष्य केले आहे. २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या खेळण्याच्या शक्यता फॉर्म, फिटनेस आणि पॅशन वर अवलंबून आहेत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी मालिका या पैलूंची एक महत्त्वाची परीक्षा असेल असा विश्वास भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.
शास्त्री म्हणाले की, या दोन्ही दिग्गज खेळाडूंना त्यांचे स्थान निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार कामगिरी करावी लागेल. १९ ऑक्टोबरपासून पर्थमध्ये सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी रोहित आणि कोहलीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा : AUS vs IND : किंग कोहली मायदेशी परतला! विमानतळावर विराटची झलक पाहण्यासाठी उडाली झुंबड; पहा Video
काया स्पोर्ट्सच्या समर ऑफ क्रिकेट लाँच इव्हेंट मध्ये शास्त्री म्हणाले की, म्हणूनच ते येथे आहेत (ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळतआहेत). ते या संघ संयोजनाचा भाग आहेत. ते त्यांच्या फिटनेस, पेंशन आणि अर्थातच फॉर्मवर अवलंबून आहे. त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे असे मला वाटते. या मालिकेच्या शेवटी, त्यांना स्वतःला कसे वाटते हे कळेल आणि त्यानंतर निर्णय त्यांचा असेल. रोहित आणि कोहली सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळतात. पुढील एकदिवसीय विश्वचषक अजून दोन वर्षे दूर असल्याने ते भारताच्या दीर्घकालीन योजनांमध्ये बसतात की नाही हे पाहणे बाकी आहे. तोपर्यंत, रोहित ४० वर्षांचा असेल आणि कोहली ३८ वर्षांचा असेल.
हेही वाचा : Ind vs WI : भारताकडून वेस्ट इंडिजचा सुफडा साफ! क्लीन स्वीप देऊन गिल आर्मीने साधली जागतिक विक्रमाशी बरोबरी
अलीकडेच, शुभमन गिलने रोहितची जागा घेतली आणि भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. रोहित आणि कोहलीने फेब्रुवारीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, जिथे भारत विजयी झाला. रोहितला अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले, तर कोहली संपूर्ण स्पर्धेत अव्वल पाच फलंदाजांमध्ये होता, त्याने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाच्या दृष्टिकोनातून, मार्चमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या स्टीव्ह स्मिथलाही हेच लागू होते. त्या वयात, तुम्हाला खेळाचा आनंद घ्यावा लागतो आणि तुमच्यात अजूनही जोश आहे.