
फोटो सौजन्य - IANS
या तिन्ही खेळाडूंनी मुंबईतील मानाचा बाप्पा विघ्नहर्ता सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरात दर्शन घेतले. आल्यानंतर भारतीय खेळाडूंनी बाप्पााला नमस्कार करत प्रार्थनाही केली. यापूर्वी, अंतिम सुपर 8 सामन्यापूर्वी अनेक भारतीय खेळाडूंनी कोलकाता येथील कालीघाट काली मंदिरात भेट दिली होती.
यापूर्वी पहिल्या सुपर 8 सामन्यात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 78 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे मेन इन ब्लू सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल अशी अटकळ बांधली गेली होती. पण पुढे टीम इंडियाने शेवटचे दोन सामने चांगली खेळू करुन चांगल्या फरकाने जिंकले आणि सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे.
सूर्या ब्रिगेडने त्यांचा पुढचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्यांनी ७२ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर, त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा सामना ५ विकेट्सने जिंकला. टीम इंडियाच्या विजयात संजू सॅमसनने महत्त्वाची भूमिका बजावली. संजूने ५० चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकार मारत ९७ धावा केल्या होत्या. सुरुवातीला पहिल्या ११ मध्ये स्थान नसताना नंतर एन्ट्री करुन संजूने आपली उत्कृष्ट खेळी दाखवली.आता सूर्याचे शिलेदार सेमीफायनलसाठी सज्ज झाली आहे. इंग्लंडचं तगडं चॅलेंज समोर असताना हा सामना रंगत घेणार आहे. मुंबईच्या धरतीवर ऐतिहासिन वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
भारत आणि इंग्लंड गेल्या दोन वेळा T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळले आहेत . हा सामना सलग तिसऱ्या T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना म्हणून खेळला जात आहे. 2022मध्ये, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीतही खेळले होते. ज्यात इंग्लंड टीमने विजय मिळवला होता. 2024 मध्ये, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीतही खेळले होते. ज्यात भारतीय टीमने विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळीही हा सामना हाय-व्होल्टेज असणार आहे.