
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आज भारतीय संघाचा विश्वचषकातील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना हा नामिबिया विरुद्ध दिल्लीच्या मैदानावर रंगणार आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये वानखेडेच्या मैदानावर यूएसएला पराभूत करून कमालीची सुरुवात केली होती आता टीम इंडियाचे दुसऱ्या सामन्यावर अनेक दुसऱ्या विजयावर नजर असणार आहे. भारताच्या संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे याचे कारण म्हणजे भारताचा पुढील सामना हा पाकिस्तान विरुद्ध होणार आहे आणि पाकिस्तानच्या संघाने आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून त्यांची मजबूत पकड निर्माण केली आहे.
भारत विरुद्ध नामिबिया या दोन्ही संघांचा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवला जाणार आहे हे भारतीय संघाचे हेड कोच गौतम गंभीर यांचे होम ग्राउंड आहे. पहिल्या सामन्याबद्दल सांगायचं झाले तर भारताच्या संघाची फलंदाजी फार काही चांगली झाली नाही पण गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली होती. त्याचबरोबर या सामन्यांमध्ये काही खेळाडू हे खेळणार नाहीत असे वृत्तांची माहिती होती. पहिल्या सामन्यात भारताच्या संघाने अमेरिकेला 29 धावांनी पराभूत केले होते. आता या सामन्यात भारताचा संघ त्यांच्या फलंदाजीने नामिबियाविरुद्ध चांगले कामगिरीची अपेक्षा करत असणार. नामिबिया भारताला अडचणीत आणू शकते दिल्लीची खेळपट्टी आजच्या सामन्यात कशी असणार गोलंदाजांना मदत मिळणार की फलंदाज धावांचा पाऊस पडणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारत आणि नामिबिया यांच्यातील स्पर्धेतील १८ वा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावर सामान्यतः फलंदाजांना भरपूर संधी मिळते. चेंडू बॅटवर चांगला येतो आणि चौकार आणि षटकार भरपूर असतात. अरुण जेटली स्टेडियमच्या सीमारेषा देखील खूपच लहान आहेत, ज्याचा फलंदाज पूर्ण फायदा घेतात. तथापि, या स्पर्धेत फिरकी गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दिल्लीच्या या मैदानावर चेंडू बराच वळत आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावरील आकडेवारीवर नजर टाकली तर या मैदानावर आत्तापर्यंत 15 सामने झाले आहेत त्यापैकी फक्त 5 सामने हे पहिले फलंदाजी करून विजय मिळवता आला आहे. तर दहा सामने हे लक्षाचा पाठलाग करणारे संघ जिंकले आहेत याचा अर्थ असा की जर मैदानावर भारताने पहिले गोलंदाजी घेतली तर त्याचा नक्कीच फायदा टीम इंडियाला होऊ शकतो. भारत आणि नामिबिया यांच्यामधील सामन्यांमध्ये पहिल्या डावात सरासरी धावसंख्या ही 145 आहे त्या दुसऱ्या गावामध्ये सरासरी धावसंख्या ही 134 आहे.
Game Face 🔛 Next up ⏩ #INDvNAM tomorrow 💪#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue pic.twitter.com/8HWsq4IYKJ — BCCI (@BCCI) February 11, 2026
मागील सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह तब्येत ठीक नसल्यामुळे सामन्याला मुकला होता. तर अभिषेक शर्माची प्रकृती खराब असल्यामुळे तो नामिबिया विरुद्ध होणारा सामन्यांमध्ये खेळणार नाही अशी माहिती होती त्याची प्रकृती खराब असल्यामुळे त्याला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. जर अभिषेक शर्मा नामिबियाविरुद्ध सामन्यात खेळला नाही तर संजू सॅमसंन त्याच्या जागेवर खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताच्या संघ पुढील सामना हा पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे हा सामना कोलंबोमधील प्रेमादासाला स्टेडियमवर रंगणार आहे.