
IND vs NZ T20 Series: 'I wasn't getting respect, Abhishek made me feel like myself...' Yuvraj Singh reminisces about the past.
Yuvraj Singh reminisced about the past : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी देखील त्याची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही. तो नेहमी चर्चेत असतो. आता अशातच त्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत एक विधान केले आहे. हा माजी दिग्गज क्रिकेपटू म्हणाला की, एक वेळ अशी आली होती जेव्हा त्याला क्रिकेट खेळायला आवडत नव्हते आणि पूर्वीसारखा आदर देखील वाटत नव्हता. युवराज सिंगच्या मते, जेव्हा त्याला वाटू लागले की तो संघात पूर्वीइतके योगदान देऊ शकत नाही, तेव्हा त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. माजी टेनिस दिग्गज सानिया मिर्झाच्या “सर्व्हिंग इट अप विथ सानिया” या यूट्यूब शोमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान त्याने मोठा खुलासा केला.
माजी टेनिस दिग्गज सानिया मिर्झाच्या “सर्व्हिंग इट अप विथ सानिया” या यूट्यूबवरच्या संभाषणात युवराज सिंगने भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माबद्दल देखील मोकळेपणाने गप्पा मारल्या. युवराज सिंगला अभिषेक शर्माचा मार्गदर्शक मानण्यात येते. युवराज सिंग म्हणाला की अभिषेकची फलंदाजी पाहून त्याला त्याच्या सुरुवातीच्या दिवस आठवतात. कारण त्यांच्या फलंदाजीच्या शैली बऱ्याचशा सारख्या आहेत. तसेच युवराज असा देखील विश्वास व्यक्त करतो की, अभिषेक त्याला भारतीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत करू शकतो.
युवराज सिंगने देखील स्पष्ट केले की अभिषेक शर्माचे यश एका रात्रीत येऊन मिळाले नाही. त्याने सानियाला सांगितले की अभिषेकची स्फोटक फलंदाजी ही एक-दोन महिन्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ नसून चार वर्षे आणि तीन महिन्यांच्या सातत्यपूर्ण तयारीचे फळ आहे. युवराज पुढे म्हणाला की, त्यांच्याकडे अभिषेकसाठी दीर्घकालीन योजना देखील आहेत. तो स्पष्टपणे म्हणतो की, ते त्याला फक्त आयपीएल किंवा रणजी ट्रॉफीसाठीच नव्हे तर भारतासाठी खेळण्यासाठी तयार करत आहेत.
युवराज सिंगने त्यांच्या निवृत्तीशी संबंधित एक महत्त्वाचा खुलासा देखील केला. युवराजने स्पष्ट केले की महेंद्रसिंग धोनीने त्याला एकदा स्पष्टपणे सांगितले होते की तो संघाच्या भविष्यातील नियोजनाचा भाग नाहीत. युवराजच्या मते, त्या काळात त्याला स्वतःच्या कारकिर्दीवर ओझे वाटू लागले होते. त्याला खेळाचा आनंद घेता येत नव्हता आणि त्याला योग्य तो आदर देखील वाटत नव्हता. म्हणून या या मनःस्थितीत त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला.
२०११ च्या विश्वचषक विजयाचा नायक ठरलेला युवराज सिंगला त्यानंतर कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रासले होते. उपचारानंतर तो पुनरागमन करू शकला, परंतु पूर्वीसारख मात्र त्याला खेळता आले नाही. २०१४ ते २०१७ दरम्यान त्याला विशेषतः कठीण काळातून जावे लागेल. २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने १५० धावांची संस्मरणीय खेळी खेळली असली तरी त्याला आपल्या खेळात सातत्य दाखवता आले नाही आणि अखेर, त्याने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.