
सूर्यकुमार यादवची प्रतिक्रियेचा व्हिडिओ झाला व्हायरल
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वर भारतीय संघाचे सलग 3 पराभव
भारत इंग्लंड अन् मधला दुसरा सामना उद्या होणार
India Vs England T20 Series: सध्या भारत अन् इंग्लंडच्या संघात 5 टी 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील 2 सामने पार पडले आहेत. एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तर दुसरा सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. आयर्लंडविरुद्ध देखील भारताचा पराभव झाला आहे. यावर आता टी 20 संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
उद्या भारत अन् इंग्लंड यांच्यात तिसरा टी 20 सामना उद्या होणार आहे. टी 20 मधले धुरंदर खेळाडू असून देखील भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही. सूर्यकुमार यादवचा फॉर्म खराब असल्याने त्याचे कर्णधारपद काढून श्रेयस अय्यरला नवीन जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्याच्या नेतृत्वात देखील भारताला विजय मिळवता आलेला नाही.
भारतीय संघाचा आयर्लंडने पहिल्यांदाच पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने पराभव केला. त्यामुळे सूर्यकुमार यादवला याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला असतं त्याची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने 2026 चा टी 20 वर्ल्डकप जिंकला आहे.
Suryakumar Yadav cooked someone 🤣🔥 When a paps said, "We miss you in Team India," listen to his reply…. 😂🔥 pic.twitter.com/toXDuoH2Vf — Jara (@JARA_Memer) July 4, 2026
सध्या माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सूर्यकुमार यादव एका सलूनमध्ये जाताना तया व्हीडिओत दिसत आहे. त्यावेळेस त्याला पावसामुळे आतमध्ये जाण्याची घाई होती. मात्र त्याला तिथे असणाऱ्या काही जणांनी त्याला तुमची टी 20 मालिकेत उणीव जाणवत आहे. त्यावर सूर्यकुमार यादवने ‘काय? सगळे काही ठीक सुरू आहे. ‘ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळेस तिथे सर्व उपस्थित हसताना दिसून येत आहेत.
जाणार, जाणार! Shreyas Iyer कॅप्टन्सी धोक्यात? रँकिंग घसरले; आयर्लंड दौऱ्यापासून विजयाचा दुष्काळ कायम
आयर्लंड दौऱ्यापासून विजयाचा दुष्काळ कायम
टीम इंडिया श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आयर्लंड दौऱ्यापासून भारताला टी 20 सामना जिंकता आलेला नाही. जेव्हा भारत अन् इंग्लंड यांच्यातील सिरिज सुरू होण्याच्या आधी भारतीय संघाची आयसीसी टी 20 रॅंकिंग 272 इतकी होती. तर इंग्लंडची रॅंकिंग 262 इतकी आहे. मात्र आता भारताचा परभव होत असल्याने भारताचे रॅंकिनह 1 पॉइंटने कमी झाले आहे. भारताचे पॉईंट्स आटा 271 झाले आहेत. तर इंग्लंडचे रेटिंग 262 वरुण 264 इतके झाले आहे. दोन्ही संघांमध्ये असणारा 10 पॉईंट्सचा फरक आटा 7 पॉईंट्सवर आला आहे.