
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs Australia Women : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा शेवटचा सामना आज अॅडलेड ओव्हल येथे खेळला जाणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरा टी-२० सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. भारतीय महिलांना मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्या सामन्यात डीएलएस पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने कॅनबेरा येथे भारताचा १९ धावांनी पराभव करत पुनरागमन केले.
तिसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने या तिसऱ्या सामन्यामध्ये महत्वाचा बदल केला आहे. भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियात तिन्ही स्वरूपात अद्याप द्विपक्षीय मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे, आज इतिहास घडवण्याची संधी आहे. दोन्ही संघानी प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही.
🚨 Toss 🚨#TeamIndia have won the toss and will bat first in the 3️⃣rd #AUSvIND T20I. pic.twitter.com/Zdd28krpKk — BCCI Women (@BCCIWomen) February 21, 2026
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी चांगली सुरुवात केली पण त्यांना मोठ्या डावात रूपांतरित करण्यात अपयश आले. त्यामुळे तिसऱ्या टी-२० सामन्यात या दोन्ही फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचे एक प्रमुख कारण म्हणजे सलग अचानक विकेट गमावणे, ज्यामुळे मधली फळी पूर्णपणे कोसळली.
धक्कादायक! T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशचे दोन खेळाडू मानसिकदृष्ट्या गेले कोमात
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आणि क्रांती गौडच्या जागी श्रेयंका पाटीलला संघात स्थान दिले. “आम्ही प्रथम फलंदाजी करू,” हरमनप्रीत कौर म्हणाली. “आम्हाला चांगली धावसंख्या उभारण्याची आशा आहे. आम्हाला आमच्या भागीदारींवर काम करावे लागेल. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.”
बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वोल, फोबे लिट्चफील्ड, एलीसे पेरी, एशले गार्डनर, जॉर्जिया वेयरहैम, एनाबेल सदरलैंड, ग्रेस हैरिस, किम गार्थ, सोफी मोलिनक्स (कर्णधार), डार्सी ब्राउन.
स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, अमनजोत कौर, श्रेयंका पाटिल, अरुंधति रेड्डी, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकुर.