
आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. भारताने पाकिस्तानचा ६४ रन्सने पराभव केला. भारताकडून हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानाने व रिचा घोषने शानदार फलंदाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभी करून दिली होती.
तसेच भारतीय संघाने शानदार गोलंदाजी देखील केली. भारताने पाकिस्तानला १०६ रन्सवर ऑल आउट केले. श्री चरणी, दीप्ती शर्मा आणि श्रेयांका पाटील या स्पिनर्सने शानदार गोलंदाजी करत पाकिस्तानला धूळ चारली आहे. तर दुसरीकडे नेदरलँड्सच्या संघाने आपल्या पहिल्या सामना पराभव पाहिला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारत आपल्या दुसऱ्या तर नेदरलँड्स आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. दीप्ती शर्मा आणि श्री चरानी या जोडीने मिळून आठ विकेट्स घेतले. दीप्तीने पाच विकेट्स घेऊन पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
बांगलादेशविरुद्ध आपला पहिला सामना गमावल्यानंतर नेदरलँड्सचा संघ आज भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे. कर्णधार बॅबेट डी लीडेने मान्य केले की, त्यांचा संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. ती म्हणाली, “आम्ही खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही. फलंदाजीत आम्ही काही धावांनी कमी पडलो आणि क्षेत्ररक्षणातही काही झेल सोडले. आम्हाला खूप काही शिकायचे आहे आणि सुधारणा करायची आहे.”
भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड.
जगातील 100 प्रभावशाली खेळाडूंमध्ये फक्त ‘एकच’ भारतीय; Smriti Mandhana ने वाढवला भारताचा गौरव
नेदरलँड्स: स्टेरे कॅलिस, सान्या खुराना, फोबी मोल्केनबोअर, बाबेट डी लीडे (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रॉबिन रिजके, आयरिस झविलिंग, हीदर सीगर्स, फ्रेडरिक ओव्हरडाईक, कॅरोलिन डी लँग, सिल्व्हर सीगर्स, इसाबेल वॉन.