Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक

भारताच्या महान फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीने अनेक विक्रम रचले आहेत. त्याने एक आगळा-वेगळा विक्रम नोंदवला आहे. विराट कोहली हा भारताच्या स्वातंत्रदिनी शतक झळकवणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 15, 2025 | 07:14 PM
Independence Day 2025: What legends like Gavaskar and Sachin could not do, this player did; Scored a century on August 15

Independence Day 2025: What legends like Gavaskar and Sachin could not do, this player did; Scored a century on August 15

Follow Us
Follow Us:

Virat Kohli scored a century on Independence Day: भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. तो मैदानावर असला की विरोधी टीमच्या गोलंदाजांना घाम फुटतो. तो कुणावरच दया करत नाही. त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. त्याममध्ये त्याने एक विशेष केला आहे ते म्हणजे त्याने भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी शतक झळकावले आहे. स्वातंत्र्यदिनी शतक झळकावणारा विराट कोहली हा भारतीय क्रिकेट इतिहासातील एकमेव फलंदाज आहे. विशेष म्हणजे कोहलीने परदेशाच्या भूमीवर हा पराक्रम केला आहे.

२०१९ मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना तिने भारतने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली होती. या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना १४ ऑगस्ट रोजी सुरू झाला होता. पावसामुळे सामना भारतीय वेळेनुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट पर्यंत चालला होता. या सामन्यात कोहलीने शतक झळकावले आणि एक विक्रम आपल्या नावावर केला होता. विराट कोहलीच्या शतकामुळे टीम इंडियाने केवळ सामना जिंकला नाही तर मालिका देखील आपल्या खिशात टाकली.

हेही वाचा : ‘मी बोर्डासाठी नाही, भारतासाठी खेळतो..’, सचिन तेंडुलकरने सुरु केलेली ३३ वर्षांपूर्वीची ‘ती’ प्रथा आज देखील कायम

या विराट कोहलीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ख्रिस गेलच्या तुफानी ७२ आणि एविन लुईसच्या ४३ धावांच्या मदतीने वेस्ट इंडिजने ३५ षटकांत ७ गडी गमावून २४० धावा उभ्या केल्या होत्या. ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली होती. परंतु, नियमित अंतराने विकेट पडत गेल्या. पावसामुळे या सामन्यात अडचणी येत गेल्या.

भारताला ३५ षटकांत विजयासाठी २५५ धावा करायच्या होत्या. भारताची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या १० धावा काढून माघारी गेला. पण त्यानंतर धवन आणि कोहली यांनी मोठी भागीदारी रचली आणि भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर कोहलीने अय्यरसोबत चौथ्या विकेटसाठी ९४ चेंडूत १२० धावांची मोठी भागीदारी रचली आणि भारताचा विजय सोपा केला.

या सामन्यात कोहलीने ९९ चेंडूचा सामना करत ११४ धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने १४ चौकार देखील लगावले. तसेच श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ६५ धावा केल्या होत्या. भारताने ३२.३ षटकांत २५६ धावा करत सामना सहज जिंकला आणि मालिका विजय निश्चित केला. या शतकी खेळीसाठी कोहलीला सामनावीराचा पुरस्कार दिला गेला होता. उल्लेखनीय म्हणजे हा सामना ख्रिस गेलच्या एकदिवसीय कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. गेलने याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती, मात्र हा त्याचा शेवटचा सामना आहे असे सर्वांना वाटत आले होते.

हेही वाचा : ‘धोनीने इलेव्हनमधून वगळले आणि मी निवृत्ती..’, वीरेंद्र सेहवागने केला खळबळजनक खुलासा

Web Title: Independence day 2025 virat kohli scored a century against west indies on august 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 07:14 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Sachin Tendulkar
  • virat kohali
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे
1

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.